शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत ...

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या सावटाखाली गेले आहे. अजूनही कोरोनाचे संकट कमी झाले नाही. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे व बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने हे वर्ष सर्वसामान्यांसाठी अत्यंत कठीण गेले. कोरोना आणि महागाईसोबत दोन हात करताना जनता हताश झाली आहे. या वर्षाच्या प्रारंभालाच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या. हे सरकार नक्कीच सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेईल, असे वाटत होते. मात्र हा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कोरोनामुळे हे वर्ष खूप कठीण गेले. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गोरगरिबांचे जगणे अवघड झाले आहे. अशा वेळी तरी सरकारने मदत करण्याची गरज होती.

- प्रीती वाघमारे, सर्वसामान्य गृहिणी

लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडून गेली आहे. महागाईने कळस गाठला आहे. सात, आठ महिने दळणवळण बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हा अर्थसंकल्प काही देईल असे वाटत नाही.

- गजानन सावकार, किराणा दुकानदार

या सरकारकडून अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे आहे.कारण मागील चार, वर्षांपासून सामान्यांसाठी हिताचे निर्णय घेतले नाहीत. खाजगी क्षेत्रातील पगारवाढ थांबलेली आहे. तर इकडे महागाई वाढली आहे.

- शरद जाधव, खाजगी नोकरदार

मागील वर्ष हे निश्चित सर्वांची कसोटी घेणारे ठरले. त्यामुळे या बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी ठोस निर्णय नसल्याने सामान्य व्यापारी काय प्रतिक्रिया देऊ शकतो. अपेक्षा अधिक आहेत, मात्र त्या फोल ठरत आहेत.

- शेख इब्राहीम, व्यापारी

मागील सात, आठ महिने ऑटो रिक्षा बंदच होत्या. हजारो चालकांवर उपासमारीची वेळ आली. सरकारकडून ऑटो चालकांसाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यातच आता पेट्रोलचे दर वाढल्याने अवघड झाले आहे.

-संतोष भालेराव, ऑटो चालक

प्रत्येक अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांचा लाभ कधीच शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्ग संकटाचा सामना करताना सरकारकडून भरघोस मदतीची गरज आहे.

- लक्ष्मण चंदेल, शेतकरी

कोरोनामुळे दळणवळणाचे कंबरडे मोडले आहे. अजूनही या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. पेट्राेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी परवडत नसल्याची ओरड आहे. हे बजेट सामान्यांचे व्हावे, हीच अपेक्षा.

- विशाल पावडे, पेट्राेल पंप चालक

यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर जास्त भर दिला आहे. लाॅकडाऊनच्या काळात आपणास कृषी क्षेत्राने मोठी मदत दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे बजेट लाभदायी आहे.

-दत्तात्रय टिकोरे, ज्येष्ठ नागरिक

बजेट काय असते हे माहिती नाही, पण सरकार काही तरी वर्षाला घोषणा करते हे माहित आहे. आम्हाला याची माहिती नसली तरी सरकारने आम्हा गोरगरिबांसाठी काही तरी चांगले करावे.

-मनिषा कांबळे,भाजीपाला विक्रेत्या

अर्थसंकल्पात केवळ आरोग्य क्षेत्रावरील वाढत्या खर्चाची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवता येईल अशी यंत्रणा विकसित करावी, एवढी अपेक्षा आहे.

- शंकर स्वामी, युवक

रेल्वेस्थानक

सध्या कोरोनामुळे नांदेड रेल्वे स्थानकावर गाड्यांची ये- जा कमी असल्याने प्रवाशांची वर्दळही तशी कमीच आहे. मात्र दोन प्रवासी सरकारच्या बजेटविषयी अपेक्षा व्यक्त करताना चर्चा करत होते.

बसस्थानक

नांदेड येथील बसस्थानकावर नेहमीसारखीच गर्दी होती. शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद बसस्थानकातील प्रवाशांवर विशेष उमटले नाहीत. ते आपल्याच घाईगडबडीत होते. गाडी कधी लागेल, याची प्रतीक्षा त्यांना होती.