शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत ...

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या सावटाखाली गेले आहे. अजूनही कोरोनाचे संकट कमी झाले नाही. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे व बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने हे वर्ष सर्वसामान्यांसाठी अत्यंत कठीण गेले. कोरोना आणि महागाईसोबत दोन हात करताना जनता हताश झाली आहे. या वर्षाच्या प्रारंभालाच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या. हे सरकार नक्कीच सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेईल, असे वाटत होते. मात्र हा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कोरोनामुळे हे वर्ष खूप कठीण गेले. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गोरगरिबांचे जगणे अवघड झाले आहे. अशा वेळी तरी सरकारने मदत करण्याची गरज होती.

- प्रीती वाघमारे, सर्वसामान्य गृहिणी

लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडून गेली आहे. महागाईने कळस गाठला आहे. सात, आठ महिने दळणवळण बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हा अर्थसंकल्प काही देईल असे वाटत नाही.

- गजानन सावकार, किराणा दुकानदार

या सरकारकडून अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे आहे.कारण मागील चार, वर्षांपासून सामान्यांसाठी हिताचे निर्णय घेतले नाहीत. खाजगी क्षेत्रातील पगारवाढ थांबलेली आहे. तर इकडे महागाई वाढली आहे.

- शरद जाधव, खाजगी नोकरदार

मागील वर्ष हे निश्चित सर्वांची कसोटी घेणारे ठरले. त्यामुळे या बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी ठोस निर्णय नसल्याने सामान्य व्यापारी काय प्रतिक्रिया देऊ शकतो. अपेक्षा अधिक आहेत, मात्र त्या फोल ठरत आहेत.

- शेख इब्राहीम, व्यापारी

मागील सात, आठ महिने ऑटो रिक्षा बंदच होत्या. हजारो चालकांवर उपासमारीची वेळ आली. सरकारकडून ऑटो चालकांसाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यातच आता पेट्रोलचे दर वाढल्याने अवघड झाले आहे.

-संतोष भालेराव, ऑटो चालक

प्रत्येक अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांचा लाभ कधीच शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्ग संकटाचा सामना करताना सरकारकडून भरघोस मदतीची गरज आहे.

- लक्ष्मण चंदेल, शेतकरी

कोरोनामुळे दळणवळणाचे कंबरडे मोडले आहे. अजूनही या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. पेट्राेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी परवडत नसल्याची ओरड आहे. हे बजेट सामान्यांचे व्हावे, हीच अपेक्षा.

- विशाल पावडे, पेट्राेल पंप चालक

यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर जास्त भर दिला आहे. लाॅकडाऊनच्या काळात आपणास कृषी क्षेत्राने मोठी मदत दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे बजेट लाभदायी आहे.

-दत्तात्रय टिकोरे, ज्येष्ठ नागरिक

बजेट काय असते हे माहिती नाही, पण सरकार काही तरी वर्षाला घोषणा करते हे माहित आहे. आम्हाला याची माहिती नसली तरी सरकारने आम्हा गोरगरिबांसाठी काही तरी चांगले करावे.

-मनिषा कांबळे,भाजीपाला विक्रेत्या

अर्थसंकल्पात केवळ आरोग्य क्षेत्रावरील वाढत्या खर्चाची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवता येईल अशी यंत्रणा विकसित करावी, एवढी अपेक्षा आहे.

- शंकर स्वामी, युवक

रेल्वेस्थानक

सध्या कोरोनामुळे नांदेड रेल्वे स्थानकावर गाड्यांची ये- जा कमी असल्याने प्रवाशांची वर्दळही तशी कमीच आहे. मात्र दोन प्रवासी सरकारच्या बजेटविषयी अपेक्षा व्यक्त करताना चर्चा करत होते.

बसस्थानक

नांदेड येथील बसस्थानकावर नेहमीसारखीच गर्दी होती. शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद बसस्थानकातील प्रवाशांवर विशेष उमटले नाहीत. ते आपल्याच घाईगडबडीत होते. गाडी कधी लागेल, याची प्रतीक्षा त्यांना होती.