शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त कॅनॉलमुळे पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:55 IST

इसापूरमधून १२ डिसेंबरला सोडणार पाणी 

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सात तालुक्यांना मिळणार लाभ कालव्यांची अवस्था मात्र वाईट

 बी़व्ही़चव्हाण । युनूस नदाफ। सुनील चौरे

नांदेड : इसापूर कालव्यातून १२ डिसेंबरपासून नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यांना पाणी सोडण्यात येणार आहे़ यंदा इसापूरमधून तीन पाणी पाळ्या सोडण्यात येणार आहेत़ परंतु ठिकठिकाणी कालवे नादुरुस्त असल्यामुळे सोडलेले लाखो लिटर पाणी वाया जाण्याची दाट शक्यता आहे़ अनेक ठिकाणी तर कालव्याला मोठी भगदाडे पडली आहेत़

अर्धापूर तालुक्याला निमगाव येथील सी.आर.गेटद्वारे अर्धापूर शाखा कालव्यात येणाऱ्या लहान कालव्यात झाडेझुडपे आणि पाईपमधील दगड, माती काढणी करण्यात आली नाही़ गेल्या काही वर्षांपासून कॅनॉलची स्वच्छताच करण्यात आली नाही़ त्यामुळे कालव्यात झाडे वाढली आहेत. तसेच जागोजागी कालव्याला भेगा पडल्या आहेत़ दगडमातीने कालव्याची रुंदी आणि खोली कमी झाली आहे़  

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाकडून इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्यातील काही भागात शेतीसाठी  सोडण्यात येते़ त्यामुळे या भागात बागायती शेती आहे़ अर्धापूरला याच पाण्यावर हळद, ऊस, हरभरा, गहूू , ज्वारी आदी पिके घेतली जातात़ प्रामुख्याने केळीला देशातच नव्हे, तर परदेशातही मागणी आहे़ मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सरासरीपेक्षा कमी होत असल्याने या भागात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती.

यंदा इसापूर धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने या भागाकरिता पाणीपाळ्या सोडण्याचे जाहीर केले़ त्यानुसार पहिली पाणीपाळी १२ डिसेंबर सोडण्यात येणार आहे़ आर. एम. २३ चोरंबा शिवारातून पार्डी शिवारात येणाऱ्या कॅनॉलमध्ये मोठंमोठी बाभळीची झाडे वाढली आहेत तसेच सिमेंटचे बांधकाम फुटून गेले आहे. नळीमध्ये कचरा, माती, दगड  गोळा झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन लाखो लिटर पाणी वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ चोरंबा शिवारातून येणाऱ्या कॅनॉल आर.एम.२३ हा नांदेड - नागपूर महामार्गामधून पार्डी शिवारात येतो. रस्त्याची लांबी ५० फुटांची आहे़         आर. एम. ३, ४  मध्येही झाडे वाढली आहेत. जागोजागी माती आणि दगड आहेत़ त्यामुळे पाणी त्याच ठिकाणी थांबून ते शेजारील शेतात घुसण्याची शक्यता आहे़ कॅनॉलला सिमेंटचे बांधकाम केलेले असून जागोजागी प्लास्टर फुटून त्यामध्ये झाडे, झुडपे वाढली़ 

उमरी तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर सिंचन कालव्याच्या दुरुस्तीचे कसलेही काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये  गवत, झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सिंचनासाठी येणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रवाह पुढे जातच नाही. हा साधा तांत्रिक दोष याकडेही  संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आता तर या कालव्यांचा सिंचनासाठी प्रत्यक्ष  वापर होत असताना सिंचनासाठी पाणी  सोडण्यापूर्वी कालव्यांची तात्पुरती दुरुस्तीसुद्धा केली जात नाही. कोट्यवधी रुपये खर्चून १२५ किलोमीटर अंतरावरून आणलेल्या या पाण्याचा असा जर अपव्यय होत असेल तर याची  प्रशासनाने गंभीरपणे  दखल घेणे आवश्यक बनले आहे.  प्रत्यक्ष  या भागात कालव्याचे काम होताना मातीकाम व्यवस्थित झालेले नाही.  मातीचा भराव भरण्यात आला नाही. त्यामुळे दोष राहिले व बऱ्याच  ठिकाणी कालव्यामध्ये नेहमीच  पाणी साठा होऊन राहतो. यामुळे   खालच्या भागातील शेतीमध्ये दलदल निर्माण होते. अनेकवेळा या भागात कालवा फुटून पाणी वाया गेल्याची घटना घडलेल्या आहेत. मात्र अद्यापपावेतो या ठिकाणची दुरुस्ती व तांत्रिक          दोष दूर करण्याबाबत संबंधित विभागाकडून प्रयत्न झाले नाहीतहदगाव तालुक्यात ९० कि.मी. अंतराचा उर्ध्व पैनगंगा नदीवर प्रकल्प आहे. परंतु बांधकाम झाल्यापासून आतापर्यंत मजबुतीकरणाचे मोठे काम न झाल्यामुळे या कालव्यातून ठिकठिकाणी गळती लागते. त्यामुळे    शेवटपर्यंत पाणी पोहोेचण्यासाठी मोठा कालावधी लागतो.

इसापूर धरणाच्या पाण्याचा हदगाव, हिमायतनगर तालुक्यांतील ६८ गावांना लाभ मिळतो. परंतु कळमनुरी तालुक्यातील दाती या गावापासून सुरु झालेला कालवा कानेगाव, चिखली फुटानामार्गे करमोड-पिंपरखेड हदगाव तालुक्यातून सहस्त्रकुंड धबधब्यापर्यंत वाहतो. परंतु पिंपरखेड, रुई, अंबाळा, वायफना, आवती आदी ठिकाणी दरवर्षी हा कालवा फुटतो. पाणी सोडण्यापूर्वीच या कालव्याची दुरुस्ती आवश्यक असते परंतु कालवा फुटल्यानंतरच कालव्याच्या कामाला निधी       मिळतो. त्यामुळे पाणी वाया जाणे व त्यानंतर पाणी पाळ्यासाठी विलंब होऊन शेतकऱ्यांचा हंगामही वाया जातो. 

तामसा-आष्टीमार्गे किनवट या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. उमरी-आष्टी या रस्त्यावर हा कालवा वाहतो. सध्या या रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु कालव्याचे सिमेंट काम अद्याप पूर्ण झालेच   नाही. अंबाळा, पिंपरखेड, करमोडी, शिबदरा, कोथळा आदी ठिकाणी कालव्यांना झाडांनी वेढले आहे. पाणी सोडण्यापूर्वी झाडांची तोड होणे गरजेचे आहे. झाडांच्या मुळ्यामुळे पुन्हा कालवा फुटतो. करमोडी मार्गावर या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघाताची भीती असते.सोयीनुसार काही शेतकरी या कालव्यातील पाणी कालवा फोडून स्वत:च्या गावासाठी आरक्षित  करतात़ याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. आष्टी गावात दरवर्षी  कालवा फुटतो. परंतु कायमस्वरुपी त्याचे काम केल्या जात नाही. अनेक ठिकाणी सिमेंंटची कामे उखडली आहेत. त्यामुळे पाणी काळ्या जमिनीत मुरते. पाण्याचा वेगही या नादुरुस्त कालव्यामुळे कमी करावा लागतो. त्यामुळे वाटेगाव, सिरंजनी, टेंभी या गावांना उशिरा पाणी मिळते.

कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्टच्उमरी भागातील अब्दुल्लापूरवाडी शिवाराच्या खाली असलेल्या कालव्यांचे  अस्तरीकरण झाले नाही. ज्या भागात कालव्याचे अस्तरीकरण झाले तेथे खालच्या भागातील अस्तरीकरण पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा साठा होऊन बाजूच्या शेतीमध्ये सतत पाणी झिरपत राहते. यामुळे पाणी तर वाया जाणारच त्याबरोबरच कालव्याच्या खालच्या भागातील  शेतीमध्ये दलदल निर्माण होऊन पिकेही नष्ट होणार आहेत. विशेष म्हणजे, उमरी तालुक्यात प्रारंभीच्या काळात  या सिंचन कालव्यांची कामे होताना अनेक तांत्रिक दोष राहिले. परिणामी तळेगाव शिवारातील बिरोबा मंदिर भागात काव्यामध्ये नेहमीच १० ते १५ फूट पाण्याचा साठा नेहमीच असतो. इसापूर उजवा कालव्यातून  सुमारे सव्वाशे किलोमीटर अंतरावरून हे पाणी सिंचनासाठी येते. मुख्य कालवा व त्या अंतर्गत असणाऱ्या वितरिका या कोणत्याही कालव्यांचे दुरुस्तीचे काम यावर्षी झालेले नाही. गवत, झाडेझुडपे वाढलेली आहेत.  वरच्या भागातून पाणी आल्यावर कचरा, काटेरी झुडपांच्या फांद्या अडकून पाणी एकाच ठिकाणी अडून राहते. त्यामुळे कालवे भरून फुटल्याच्या घटना या भागात अनेकदा घडल्या आहेत़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेडagricultureशेती