शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:10 IST

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़

ठळक मुद्देजनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

नांदेड : गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यावर कोसळणार अशी स्थिती जलसाठ्यावरून दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्रावर चांगला पाऊस झाला़ त्यानंतर अनेकवेळा उघडीप देवून अधूनमधून बरसणाºया पावसाने जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यातील पाणीपातळी झपाट्याने वाढली़ परंतु, परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत गेली़सोयाबीन, मूग आणि उडीद पावसाच्या पाण्यावर येणारी पिके असूनही यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने विहिरी, बोअरमधील पाणी द्यावे लागले़ परिणामी यंदा पाणीपातळीतही मोठी घट झाली.़ फेब्रुवारी, मार्चपर्यंत ज्या विहिरींचे पाणी संपत नाही, अशा विहिरींनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तळ गाठला आहे़ त्यामुळे रबी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळेल की नाही, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे़आजघडीला मुखेड, किनवटसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ जिल्ह्यात एकूण १०७ प्रकल्प आहेत़ यामध्ये मोठे दोन, मध्यम आणि लघू प्रकल्पांचा समावेश असून ८१९़९५ दलघमी प्रकल्पाची साठवणक्षमता आहे़ परंतु, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे विष्णूपुरी वगळता एकही प्रकल्प पूर्णपणे भरला नाही़ आजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघु प्रकल्पामध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़विष्णूपुरी प्रकल्पामध्ये गतवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७६ टक्के जलसाठा उपलब्ध होता़ यंदा त्यात घट झाली असून आजघडीला ५१ टक्केच पाणी उपलब्ध आहे़ यंदा २५ टक्केंनी पाणी कमी असल्याने पाणीप्रश्न उद्भवणार हे निश्चित आहे़ तर ग्रामीण भागातही भविष्यात पाणीटंचाईची समस्या चिंतेचा विषय आहे़ सदर परिस्थितीवर प्रशासनाला आजपासूनच नियोजन करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांमध्ये पाणी आरक्षित करून ठेवण्याची गरज आहे़विष्णूपुरी : सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठाआजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघू प्रकल्पांमध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण आहे़ उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईgodavariगोदावरीvishnupuri damविष्णुपुरी धरण