शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:10 IST

नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़

ठळक मुद्देजनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

नांदेड : गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यावर कोसळणार अशी स्थिती जलसाठ्यावरून दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्रावर चांगला पाऊस झाला़ त्यानंतर अनेकवेळा उघडीप देवून अधूनमधून बरसणाºया पावसाने जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यातील पाणीपातळी झपाट्याने वाढली़ परंतु, परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत गेली़सोयाबीन, मूग आणि उडीद पावसाच्या पाण्यावर येणारी पिके असूनही यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने विहिरी, बोअरमधील पाणी द्यावे लागले़ परिणामी यंदा पाणीपातळीतही मोठी घट झाली.़ फेब्रुवारी, मार्चपर्यंत ज्या विहिरींचे पाणी संपत नाही, अशा विहिरींनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तळ गाठला आहे़ त्यामुळे रबी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळेल की नाही, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे़आजघडीला मुखेड, किनवटसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ जिल्ह्यात एकूण १०७ प्रकल्प आहेत़ यामध्ये मोठे दोन, मध्यम आणि लघू प्रकल्पांचा समावेश असून ८१९़९५ दलघमी प्रकल्पाची साठवणक्षमता आहे़ परंतु, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे विष्णूपुरी वगळता एकही प्रकल्प पूर्णपणे भरला नाही़ आजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघु प्रकल्पामध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़विष्णूपुरी प्रकल्पामध्ये गतवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७६ टक्के जलसाठा उपलब्ध होता़ यंदा त्यात घट झाली असून आजघडीला ५१ टक्केच पाणी उपलब्ध आहे़ यंदा २५ टक्केंनी पाणी कमी असल्याने पाणीप्रश्न उद्भवणार हे निश्चित आहे़ तर ग्रामीण भागातही भविष्यात पाणीटंचाईची समस्या चिंतेचा विषय आहे़ सदर परिस्थितीवर प्रशासनाला आजपासूनच नियोजन करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांमध्ये पाणी आरक्षित करून ठेवण्याची गरज आहे़विष्णूपुरी : सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठाआजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघू प्रकल्पांमध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण आहे़ उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईgodavariगोदावरीvishnupuri damविष्णुपुरी धरण