शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

हदगावमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:44 IST

शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़

हदगाव : शहरातील नळयोजनेच्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने शहराला आठवड्यापासून पाणी मिळत नाही़ शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़नोव्हेंबर महिन्यात नदीला पाहिल्याच आठवड्यामध्ये रबीसाठी पाणी सोडले जाते़ त्यामुळे शहराचीही तहान भागते मात्र यावर्षी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे पाणी सोडता आले नाही़ शहराची तहान भागविण्यासाठी राखीव असलेले पाणी नगरपालिकेला जतन करता आले नाही़ यामुळे गोंधळ उडाला़ ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ ज्यांच्याकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही़ ते दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणत आहेत़ सकाळी फराळ पाण्याचा आनंद घेण्याऐवजी फराळ घरात असूनही पाण्याअभावी तो खाता आला नाही़ पाणी भरल्यानंतरच दुपारी त्यांना सण साजरा करता आला़नदीला पाणी सोडले तरीही पाण्याचा प्रवाह कमीच ठेवावा लागत असल्यामुळे पाणी शहरापर्यंत पोहचण्यासाठी ११ नोव्हेंबर उजाडणार आहे़ त्यानंतर १२ नोव्हेंबरला नळाला पाणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़ शहरातील जनतेची तहान भागविण्यासाठी ही योजना सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा हदगाव शहरालाही टँकरद्वारे पाणी पुरवर्ठा करण्याची वेळ नगरपालिकेवर येणार आहे़विकासकामे करण्यासाठी मी- तू करणारे नगरसेवक पाण्याच्या नियोजनासाठी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत़ तर विरोधक केवळ स्टंटबाजी करताना दिसत आहेत़ आगामी निवडणुकीत पाण्याची समस्या गंभीर होणार आहे़उन्हाळ्याची चिंता आतापासूनच

  • हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़
  • ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ नागरिकांना दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणावे लागले़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई