शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

हदगावमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:44 IST

शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़

हदगाव : शहरातील नळयोजनेच्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने शहराला आठवड्यापासून पाणी मिळत नाही़ शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़नोव्हेंबर महिन्यात नदीला पाहिल्याच आठवड्यामध्ये रबीसाठी पाणी सोडले जाते़ त्यामुळे शहराचीही तहान भागते मात्र यावर्षी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे पाणी सोडता आले नाही़ शहराची तहान भागविण्यासाठी राखीव असलेले पाणी नगरपालिकेला जतन करता आले नाही़ यामुळे गोंधळ उडाला़ ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ ज्यांच्याकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही़ ते दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणत आहेत़ सकाळी फराळ पाण्याचा आनंद घेण्याऐवजी फराळ घरात असूनही पाण्याअभावी तो खाता आला नाही़ पाणी भरल्यानंतरच दुपारी त्यांना सण साजरा करता आला़नदीला पाणी सोडले तरीही पाण्याचा प्रवाह कमीच ठेवावा लागत असल्यामुळे पाणी शहरापर्यंत पोहचण्यासाठी ११ नोव्हेंबर उजाडणार आहे़ त्यानंतर १२ नोव्हेंबरला नळाला पाणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़ शहरातील जनतेची तहान भागविण्यासाठी ही योजना सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा हदगाव शहरालाही टँकरद्वारे पाणी पुरवर्ठा करण्याची वेळ नगरपालिकेवर येणार आहे़विकासकामे करण्यासाठी मी- तू करणारे नगरसेवक पाण्याच्या नियोजनासाठी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत़ तर विरोधक केवळ स्टंटबाजी करताना दिसत आहेत़ आगामी निवडणुकीत पाण्याची समस्या गंभीर होणार आहे़उन्हाळ्याची चिंता आतापासूनच

  • हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़
  • ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ नागरिकांना दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणावे लागले़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई