शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:20 IST

आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़

ठळक मुद्देपाणी जपून वापरा : विष्णूपुरीत १७ तर मानारमध्ये १९ टक्के पाणी

नांदेड : आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़ नांदेड शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून बोअर, विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे़ त्यातच विष्णूपुरीसह जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़नांदेड जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प असून त्यापैकी विष्णूपुरी प्रकल्पावर नांदेड शहरासह परिसरातील गावांची तहान अवलंबून आहे़ सदर प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ त्याचबरोबर इसापूर प्रकल्पातून आसना नदीत सोडलेले पाणीदेखील आटल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ तसेच नांदेड शहरातील तरोडा, बाबानगर, टिळकनगर, आनंदनगर आदी भागातील पाणीपातळीत घट झाल्याने बोअरचे पाणी गेले़ त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे़नांदेड शहरासह जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ बारुळच्या मानार प्रकल्पावर चार तालुक्यांतील बहुतांश गावे अवलंबून आहेत़ सदर प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.नांदेड जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता अनेक गावांमध्ये आज प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत़ परंतु, काही गावांची मागणी असूनदेखील त्यांना गावात असलेल्या नळयोजनांमुळे टँकर उपलब्ध होवू शकत नाही़ बऱ्याच गावांत नळयोजना असूनही त्या आजपर्यंत सुरूच झालेल्या नाहीत़जिल्ह्यातील प्रकल्पातील दिवसेंदिवस घटणारी पाणीपातळी आणि वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेवून प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणाबरोबरच चा-याची व्यवस्था करण्याची गरज आहे़नांदेड जिल्ह्यातील मागील आठ दिवसांपासून तापमान ४२ अशांच्या वर राहिल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे़नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया कै. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५ तर बारुळ मानार प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा आहे़ तर देगलूर तालुक्यातील करडखेड १.९०, कंधार तालुक्यातील पेठवडज ०.८२, किनवट तालुक्यातील नागझरी प्रकल्पात २.२४, लोणी ३.५७, डोंगरगाव १.१७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.टंचाई : तीन मध्यम तर ४१ लघु प्रकल्प कोरडेठाकनांदेड जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, कंधार तालुक्यातील महालिंगी, लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील एकूण ८८ लघु प्रकल्पांपैकी ४१ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.त्याचबरोबर लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, उमरी, मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आदी तालुक्यांतील उर्वरित लघु प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली़ त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण