शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:20 IST

आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़

ठळक मुद्देपाणी जपून वापरा : विष्णूपुरीत १७ तर मानारमध्ये १९ टक्के पाणी

नांदेड : आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़ नांदेड शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून बोअर, विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे़ त्यातच विष्णूपुरीसह जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़नांदेड जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प असून त्यापैकी विष्णूपुरी प्रकल्पावर नांदेड शहरासह परिसरातील गावांची तहान अवलंबून आहे़ सदर प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ त्याचबरोबर इसापूर प्रकल्पातून आसना नदीत सोडलेले पाणीदेखील आटल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ तसेच नांदेड शहरातील तरोडा, बाबानगर, टिळकनगर, आनंदनगर आदी भागातील पाणीपातळीत घट झाल्याने बोअरचे पाणी गेले़ त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे़नांदेड शहरासह जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ बारुळच्या मानार प्रकल्पावर चार तालुक्यांतील बहुतांश गावे अवलंबून आहेत़ सदर प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.नांदेड जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता अनेक गावांमध्ये आज प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत़ परंतु, काही गावांची मागणी असूनदेखील त्यांना गावात असलेल्या नळयोजनांमुळे टँकर उपलब्ध होवू शकत नाही़ बऱ्याच गावांत नळयोजना असूनही त्या आजपर्यंत सुरूच झालेल्या नाहीत़जिल्ह्यातील प्रकल्पातील दिवसेंदिवस घटणारी पाणीपातळी आणि वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेवून प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणाबरोबरच चा-याची व्यवस्था करण्याची गरज आहे़नांदेड जिल्ह्यातील मागील आठ दिवसांपासून तापमान ४२ अशांच्या वर राहिल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे़नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया कै. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५ तर बारुळ मानार प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा आहे़ तर देगलूर तालुक्यातील करडखेड १.९०, कंधार तालुक्यातील पेठवडज ०.८२, किनवट तालुक्यातील नागझरी प्रकल्पात २.२४, लोणी ३.५७, डोंगरगाव १.१७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.टंचाई : तीन मध्यम तर ४१ लघु प्रकल्प कोरडेठाकनांदेड जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, कंधार तालुक्यातील महालिंगी, लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील एकूण ८८ लघु प्रकल्पांपैकी ४१ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.त्याचबरोबर लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, उमरी, मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आदी तालुक्यांतील उर्वरित लघु प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली़ त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण