शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:31 IST

ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

ठळक मुद्दे२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून काम सुरूजलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

- गोविंद शिंदेबारुळ (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून काटकळंबाची एकेकाळी ओळख होती़ अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या या गावाने श्रमदानातून जलसंधारणाचे काम हाती घेतले आणि बघता बघता  पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे़ सध्या कंधार तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना काटकळंबावासीय मात्र पाण्याबाबत निर्धास्त आहेत़  

मानार धरणाच्या शेजारी अवघ्या चार कि़मी़ अंतरावरील हे गाव. धरणाशेजारी असूनही दर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असे़ टँकरग्रस्त गाव अशीच या गावाची ओळख निर्माण झाली होती़ शेजारील उमरा येथील एका संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गावचे भूमीपूत्र बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला़ २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगाणसिद्धीला गावातील काही जणांसोबत भेट दिली आणि तेथे जलसंधारणाचे काम कशा पद्धतीने झाले, याची माहिती घेतली़ पुढे २०१२ मध्ये काटकळंबा पाणीदार गाव करण्याचा संकल्प  गावाने केला़ 

सुरुवातीला ग्रामस्वच्छता, नालीसफाई आदी उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले़ यामुळे गावात एकोपा निर्माण झाला़  क्षारयुक्त पाणी पिवून ग्रामस्थ आजारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील बालविकास संस्थेकडे पाठपुरावा केला़ त्यातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला़ २०१५ मध्ये या गावाला तीव्र पाणीटंचाईचा फटका सोसावा लागला़ यानंतर ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला आणखी गती दिली़

नेकमे काय केले?२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह मॉडेल) काम हाती घेण्यात आले़ केअरींग फ्रेंडस्, नाम फाऊंडेशन व राज्य शासनाच्या सहकार्याने गाव परिसरात ६ कि़मी़च्या नाल्याचे डोह पद्धतीने खोदकाम करण्यात आले़ या बरोबरच जलदूत प्रकल्पही राबविण्यात आला़ शिवारातील ५० एकर पडीक जमिनीवर कृषी विभागाच्या माध्यमातून खोल सलग समतल चराचे काम पूर्ण करण्यात आले़ काही बांध बंधिस्तीची कामेही पूर्ण झाली़ त्यानंतर शेततळी, गांडूळ खत युनिट आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले़ रोगराई टाळण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी गाव पाणंदमुक्त झाले़ सिंचन विभागाकडून चार सिमेंट बंधारेही बांधून घेण्यात आले़ एकूणच काटकळंबा शिवारातील १५ टक्के  शिवारात मृद व जलसंधारणाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली़  

टँकरमुक्त गावआजघडीला कंधार आणि शेजारच्या लोहा तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकुळ असताना काटकळंबावासियांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ एकेकाळी टँकरयुक्त अशी ओळख झालेल्या या गावाने जलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

अवघ्या २५ फुटांवर पाणी उपलब्धबाबुराव बस्वदे गुरुजी यांनी गावशिवारातील मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतीज्ञा केली. गावचे भूमीपूत्र तथा मिराभार्इंदर मनपाचे उपायुक्त डॉ़संभाजीराव पानपट्टे यांनीही गुरुजींना  मोलाची साथ दिली़ केअरींग फे्रंडस्सह शासकीय विभाग आणि इतरांशी समन्वय साधण्याचे काम सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले़ त्यामुळेच गावाचा चेहरामोहरा बदलला. सद्यस्थितीत ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNandedनांदेड