शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:31 IST

ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

ठळक मुद्दे२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून काम सुरूजलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

- गोविंद शिंदेबारुळ (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून काटकळंबाची एकेकाळी ओळख होती़ अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या या गावाने श्रमदानातून जलसंधारणाचे काम हाती घेतले आणि बघता बघता  पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे़ सध्या कंधार तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना काटकळंबावासीय मात्र पाण्याबाबत निर्धास्त आहेत़  

मानार धरणाच्या शेजारी अवघ्या चार कि़मी़ अंतरावरील हे गाव. धरणाशेजारी असूनही दर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असे़ टँकरग्रस्त गाव अशीच या गावाची ओळख निर्माण झाली होती़ शेजारील उमरा येथील एका संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गावचे भूमीपूत्र बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला़ २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगाणसिद्धीला गावातील काही जणांसोबत भेट दिली आणि तेथे जलसंधारणाचे काम कशा पद्धतीने झाले, याची माहिती घेतली़ पुढे २०१२ मध्ये काटकळंबा पाणीदार गाव करण्याचा संकल्प  गावाने केला़ 

सुरुवातीला ग्रामस्वच्छता, नालीसफाई आदी उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले़ यामुळे गावात एकोपा निर्माण झाला़  क्षारयुक्त पाणी पिवून ग्रामस्थ आजारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील बालविकास संस्थेकडे पाठपुरावा केला़ त्यातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला़ २०१५ मध्ये या गावाला तीव्र पाणीटंचाईचा फटका सोसावा लागला़ यानंतर ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला आणखी गती दिली़

नेकमे काय केले?२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह मॉडेल) काम हाती घेण्यात आले़ केअरींग फ्रेंडस्, नाम फाऊंडेशन व राज्य शासनाच्या सहकार्याने गाव परिसरात ६ कि़मी़च्या नाल्याचे डोह पद्धतीने खोदकाम करण्यात आले़ या बरोबरच जलदूत प्रकल्पही राबविण्यात आला़ शिवारातील ५० एकर पडीक जमिनीवर कृषी विभागाच्या माध्यमातून खोल सलग समतल चराचे काम पूर्ण करण्यात आले़ काही बांध बंधिस्तीची कामेही पूर्ण झाली़ त्यानंतर शेततळी, गांडूळ खत युनिट आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले़ रोगराई टाळण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी गाव पाणंदमुक्त झाले़ सिंचन विभागाकडून चार सिमेंट बंधारेही बांधून घेण्यात आले़ एकूणच काटकळंबा शिवारातील १५ टक्के  शिवारात मृद व जलसंधारणाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली़  

टँकरमुक्त गावआजघडीला कंधार आणि शेजारच्या लोहा तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकुळ असताना काटकळंबावासियांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ एकेकाळी टँकरयुक्त अशी ओळख झालेल्या या गावाने जलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

अवघ्या २५ फुटांवर पाणी उपलब्धबाबुराव बस्वदे गुरुजी यांनी गावशिवारातील मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतीज्ञा केली. गावचे भूमीपूत्र तथा मिराभार्इंदर मनपाचे उपायुक्त डॉ़संभाजीराव पानपट्टे यांनीही गुरुजींना  मोलाची साथ दिली़ केअरींग फे्रंडस्सह शासकीय विभाग आणि इतरांशी समन्वय साधण्याचे काम सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले़ त्यामुळेच गावाचा चेहरामोहरा बदलला. सद्यस्थितीत ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNandedनांदेड