शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:31 IST

ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

ठळक मुद्दे२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून काम सुरूजलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

- गोविंद शिंदेबारुळ (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून काटकळंबाची एकेकाळी ओळख होती़ अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या या गावाने श्रमदानातून जलसंधारणाचे काम हाती घेतले आणि बघता बघता  पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे़ सध्या कंधार तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना काटकळंबावासीय मात्र पाण्याबाबत निर्धास्त आहेत़  

मानार धरणाच्या शेजारी अवघ्या चार कि़मी़ अंतरावरील हे गाव. धरणाशेजारी असूनही दर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असे़ टँकरग्रस्त गाव अशीच या गावाची ओळख निर्माण झाली होती़ शेजारील उमरा येथील एका संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गावचे भूमीपूत्र बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला़ २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगाणसिद्धीला गावातील काही जणांसोबत भेट दिली आणि तेथे जलसंधारणाचे काम कशा पद्धतीने झाले, याची माहिती घेतली़ पुढे २०१२ मध्ये काटकळंबा पाणीदार गाव करण्याचा संकल्प  गावाने केला़ 

सुरुवातीला ग्रामस्वच्छता, नालीसफाई आदी उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले़ यामुळे गावात एकोपा निर्माण झाला़  क्षारयुक्त पाणी पिवून ग्रामस्थ आजारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील बालविकास संस्थेकडे पाठपुरावा केला़ त्यातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला़ २०१५ मध्ये या गावाला तीव्र पाणीटंचाईचा फटका सोसावा लागला़ यानंतर ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला आणखी गती दिली़

नेकमे काय केले?२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह मॉडेल) काम हाती घेण्यात आले़ केअरींग फ्रेंडस्, नाम फाऊंडेशन व राज्य शासनाच्या सहकार्याने गाव परिसरात ६ कि़मी़च्या नाल्याचे डोह पद्धतीने खोदकाम करण्यात आले़ या बरोबरच जलदूत प्रकल्पही राबविण्यात आला़ शिवारातील ५० एकर पडीक जमिनीवर कृषी विभागाच्या माध्यमातून खोल सलग समतल चराचे काम पूर्ण करण्यात आले़ काही बांध बंधिस्तीची कामेही पूर्ण झाली़ त्यानंतर शेततळी, गांडूळ खत युनिट आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले़ रोगराई टाळण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी गाव पाणंदमुक्त झाले़ सिंचन विभागाकडून चार सिमेंट बंधारेही बांधून घेण्यात आले़ एकूणच काटकळंबा शिवारातील १५ टक्के  शिवारात मृद व जलसंधारणाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली़  

टँकरमुक्त गावआजघडीला कंधार आणि शेजारच्या लोहा तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकुळ असताना काटकळंबावासियांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ एकेकाळी टँकरयुक्त अशी ओळख झालेल्या या गावाने जलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़ 

अवघ्या २५ फुटांवर पाणी उपलब्धबाबुराव बस्वदे गुरुजी यांनी गावशिवारातील मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतीज्ञा केली. गावचे भूमीपूत्र तथा मिराभार्इंदर मनपाचे उपायुक्त डॉ़संभाजीराव पानपट्टे यांनीही गुरुजींना  मोलाची साथ दिली़ केअरींग फे्रंडस्सह शासकीय विभाग आणि इतरांशी समन्वय साधण्याचे काम सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले़ त्यामुळेच गावाचा चेहरामोहरा बदलला. सद्यस्थितीत ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNandedनांदेड