शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

विष्णूपुरीतून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखला

By admin | Updated: March 4, 2015 15:33 IST

शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे.

नांदेड : शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. जेणेकरुन मे अखेरपर्यंत पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही. परंतु आजघडीला धरणातून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत पाणीउपसा करण्यात येत आहे. हा पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंतच धरण तळ गाठण्याची शक्यता आहे.

सध्या नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून चार पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. सकाळपासूनच ही पथके अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गस्त घालत आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. गावातील डीपीवरुन नागरिकांनी मोटारी लावून अवैध पाणीउपसा सुरु केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर १३७ फिडर उतरविण्यासाठी प्रशासनाने महावितरणकडे १६ लाख ५0 हजार रुपये भरले आहेत. हे सर्व फिडर उतरल्यानंतर अवैध पाणीउपशाला आळा घालण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

 पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु> इसापूर धरणातून कालव्याद्वारे आसना नदीत पाणी आणण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ते पम्पींग करुन काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. १४ कोटी ८७ लाखांच्या या योजनेसाठी पाईपची खरेदीही झाली असून विहिरीचे काम सुरु झाले आहे. १५ मे पूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याचा मनपाचा संकल्प आहे. त्यासाठी कामाची गती वाढविण्यात आली आहे.

■ शहराला आज दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तो तीन दिवसाआड किंवा सात दिवसाआड करण्याचा विचार अनेकांनी मांडला. परंतु पाणीपुरवठय़ात कपात करणे हा त्यावर तोडगा नाही. > कारण त्यामुळे फार पाणीबचत होणार नाही. या उलट अनधिकृत उपशामुळे पाणीटंचाईत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले. 

 

> नागरिकांनीही टंचाईच्या या संकटाची जाण ठेवावी. पाऊस पुढे सरकल्यास गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. विष्णूपुरीच्या वरच्या भागात असलेल्या एकाही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पाणी मिळण्याचीही अपेक्षा नाही. त्यामुळे बांधकामे,गाड्या धुणे यासारखा पाण्याचा अपव्यय टाळावा. आजघडीला दरदिवसाला 0.४0 पाण्याची हानी आहे. ती किमान 0.१0 वर आली तरी, सध्या असलेले पाणी जूनपर्यंत पुरेल. परंतु पाणीउपसा असाच सुरु राहिला अन् उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन जास्त झाले तर एप्रिल अखेरलाच नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावयाची वेळ येणार आहे. त्यात निसर्गानेही जूनमध्ये कृपादृष्टी दाखविणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाणी बचत करणे हाच एकमेव उपाय नांदेडकरांसमोर आहे.