शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विष्णूपुरीतून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखला

By admin | Updated: March 4, 2015 15:33 IST

शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे.

नांदेड : शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. जेणेकरुन मे अखेरपर्यंत पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही. परंतु आजघडीला धरणातून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत पाणीउपसा करण्यात येत आहे. हा पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंतच धरण तळ गाठण्याची शक्यता आहे.

सध्या नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून चार पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. सकाळपासूनच ही पथके अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गस्त घालत आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. गावातील डीपीवरुन नागरिकांनी मोटारी लावून अवैध पाणीउपसा सुरु केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर १३७ फिडर उतरविण्यासाठी प्रशासनाने महावितरणकडे १६ लाख ५0 हजार रुपये भरले आहेत. हे सर्व फिडर उतरल्यानंतर अवैध पाणीउपशाला आळा घालण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

 पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु> इसापूर धरणातून कालव्याद्वारे आसना नदीत पाणी आणण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ते पम्पींग करुन काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. १४ कोटी ८७ लाखांच्या या योजनेसाठी पाईपची खरेदीही झाली असून विहिरीचे काम सुरु झाले आहे. १५ मे पूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याचा मनपाचा संकल्प आहे. त्यासाठी कामाची गती वाढविण्यात आली आहे.

■ शहराला आज दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तो तीन दिवसाआड किंवा सात दिवसाआड करण्याचा विचार अनेकांनी मांडला. परंतु पाणीपुरवठय़ात कपात करणे हा त्यावर तोडगा नाही. > कारण त्यामुळे फार पाणीबचत होणार नाही. या उलट अनधिकृत उपशामुळे पाणीटंचाईत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले. 

 

> नागरिकांनीही टंचाईच्या या संकटाची जाण ठेवावी. पाऊस पुढे सरकल्यास गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. विष्णूपुरीच्या वरच्या भागात असलेल्या एकाही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पाणी मिळण्याचीही अपेक्षा नाही. त्यामुळे बांधकामे,गाड्या धुणे यासारखा पाण्याचा अपव्यय टाळावा. आजघडीला दरदिवसाला 0.४0 पाण्याची हानी आहे. ती किमान 0.१0 वर आली तरी, सध्या असलेले पाणी जूनपर्यंत पुरेल. परंतु पाणीउपसा असाच सुरु राहिला अन् उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन जास्त झाले तर एप्रिल अखेरलाच नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावयाची वेळ येणार आहे. त्यात निसर्गानेही जूनमध्ये कृपादृष्टी दाखविणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाणी बचत करणे हाच एकमेव उपाय नांदेडकरांसमोर आहे.