शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीतून होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखला

By admin | Updated: March 4, 2015 15:33 IST

शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे.

नांदेड : शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. जेणेकरुन मे अखेरपर्यंत पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही. परंतु आजघडीला धरणातून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत पाणीउपसा करण्यात येत आहे. हा पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंतच धरण तळ गाठण्याची शक्यता आहे.

सध्या नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून चार पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. सकाळपासूनच ही पथके अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गस्त घालत आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. गावातील डीपीवरुन नागरिकांनी मोटारी लावून अवैध पाणीउपसा सुरु केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर १३७ फिडर उतरविण्यासाठी प्रशासनाने महावितरणकडे १६ लाख ५0 हजार रुपये भरले आहेत. हे सर्व फिडर उतरल्यानंतर अवैध पाणीउपशाला आळा घालण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

 पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु> इसापूर धरणातून कालव्याद्वारे आसना नदीत पाणी आणण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ते पम्पींग करुन काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. १४ कोटी ८७ लाखांच्या या योजनेसाठी पाईपची खरेदीही झाली असून विहिरीचे काम सुरु झाले आहे. १५ मे पूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याचा मनपाचा संकल्प आहे. त्यासाठी कामाची गती वाढविण्यात आली आहे.

■ शहराला आज दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तो तीन दिवसाआड किंवा सात दिवसाआड करण्याचा विचार अनेकांनी मांडला. परंतु पाणीपुरवठय़ात कपात करणे हा त्यावर तोडगा नाही. > कारण त्यामुळे फार पाणीबचत होणार नाही. या उलट अनधिकृत उपशामुळे पाणीटंचाईत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले. 

 

> नागरिकांनीही टंचाईच्या या संकटाची जाण ठेवावी. पाऊस पुढे सरकल्यास गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. विष्णूपुरीच्या वरच्या भागात असलेल्या एकाही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पाणी मिळण्याचीही अपेक्षा नाही. त्यामुळे बांधकामे,गाड्या धुणे यासारखा पाण्याचा अपव्यय टाळावा. आजघडीला दरदिवसाला 0.४0 पाण्याची हानी आहे. ती किमान 0.१0 वर आली तरी, सध्या असलेले पाणी जूनपर्यंत पुरेल. परंतु पाणीउपसा असाच सुरु राहिला अन् उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन जास्त झाले तर एप्रिल अखेरलाच नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावयाची वेळ येणार आहे. त्यात निसर्गानेही जूनमध्ये कृपादृष्टी दाखविणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाणी बचत करणे हाच एकमेव उपाय नांदेडकरांसमोर आहे.