शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर नेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:18 AM

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले असले तरी अद्यापपर्यंत सरपंचपदाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच पॅनलप्रमुखांना निवडून आणलेल्या ...

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले असले तरी अद्यापपर्यंत सरपंचपदाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच पॅनलप्रमुखांना निवडून आणलेल्या सदस्यांना सहलीवर न्यावे लागले आहे. त्यात अनेक महिला सदस्य असल्याने त्यांच्या पतीसह त्यांना सहलीवर नेण्याची वेळ पॅनलप्रमुखांना आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकांपूर्वीच झाल्याने अनेक जण सरपंचपदाचे दावेदार होऊन कामालाही लागले होते. दरम्यान, काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली सरपंच, उपसरपंचपदासाठी बोली लावण्यात आली. हा एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार असल्याचे आरोप झाले. त्यानंतर शासनाने सरपंच आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा निवडणुकानंतर आरक्षण सोडत घेतली जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला. मात्र, सरपंचपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, याबाबतचा तिढा न सुटल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूककाळात होणारा अनाठायी खर्च टाळला गेला. तर, काही पॅनलप्रमुखांनी आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहील, हे गृहीत धरून पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून बहुमतासाठी आवश्यक तेवढे सदस्य निवडून आणले. परंतु, निवडणूक निकालानंतर अनेक ठिकाणी राखीव असलेल्या जागांचा उमेदवार निवडून आला नाही. परंतु, स्पष्ट बहुमत आले, अशाही घटना घडल्या. त्यामुळे हा पेच आरक्षण सोडतीनंतर सुटू शकतो. त्यामुळे ऐनवेळी कोणाला सरपंच करणार, असा प्रश्न आता गावपुढा-यांना, पॅनलप्रमुखांना पडणार आहे. त्यामुळे सदस्यांना कोणी आश्वासने देऊ नये आणि आपल्याकडे निवडून आलेले सदस्य सरपंच, उपसरपंचपदाच्या लालसेने फुटून दुस-या पार्टीत जाऊ नये, त्यासाठी अनेकांनी निकालापासूनच फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींमध्ये सहा हजार ८२१ सदस्य निवडून देण्यात आले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांना मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही डावपेचात कमी पडू नये म्हणून आरक्षण सोडत आणि सरपंच निवड कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होणार नाही, असे नियोजन करून अनेकांनी सदस्य घेऊन सहलीवर जाणे पसंत केले आहे. यापूर्वी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक सहलीवर गेल्याचे ऐकिवात होते. परंतु, सरपंचपदाच्या पेचामुळे सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना सहलीचा आनंद घेता येत आहे.