शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:06 IST

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.

ठळक मुद्दे३६० अधिग्रहणे : २७ गावांची तहान टँकरवर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या अवघा ६७ टक्के पाऊस झाला. त्यातही किनवट, माहूरसारख्या तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प राहिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे तपमानाचा पारा ४० हून अधिक असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत असल्याने जिल्हाभरात टंचाईची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. टंचाईबरोबरच प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढत आहे.तसेच अधिग्रणासाठीचे प्रस्तावही दाखल होत आहेत. टंचाई उपाययोजनासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६२ गावे आणि २७ वाड्यावर विहिरी, बोअरची ३६० अधिग्रहणे करण्यात आली आहे.तालुकानिहाय अधिग्रहणाची संख्या पाहिली असता नांदेड तालुक्यातील १२ गावांमध्ये १७ अधिग्रहणे करण्यात आली आहे. अर्धापूर ३५ गावांमध्ये ४०, मुदखेड २० गावांमध्ये ३५, भोकर ८ गावांमध्ये ८, उमरी ४ गावांमध्ये ५, हदगाव ५६ गावांमध्ये ८०, बिलोली १७ गावांमध्ये २२, नायगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ४, मुखेड १६ गावांमध्ये २४, कंधार २ गावांमध्ये २, लोहा ३२ गावांमध्ये ४०, किनवट ३६ गावांमध्ये ४४ तर माहूर तालुक्यातील २० गावांमध्ये ३८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत.याबरोबरच लोहा तालुक्यातील वाड्यामध्ये १०, मुखेड ५, हदगाव ४, अर्धापूर आणि माहूर प्रत्येकी ३ तर किनवट तालुक्यातील २ वाड्यांवर जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाने संभाव्य उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १४४७ अधिग्रहणे प्रस्तावित केली असून प्रस्तावित अधिग्रहणात सर्वाधिक १८४ अधिग्रहणांची संख्या मुखेड तालुक्यात आहे तर कंधार १५७, हिमायतनगर ८२, हदगाव १३८, भोकर १०२, लोहा ८६ किनवट तालुक्यात ११५ अधिग्रहणे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.ग्रामीण भागात टँकरची वाढती मागणीपाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना सोसाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागणी येताच संबंधित ठिकाणी टँकर देण्यास सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत २७ गावे आणि २६ वाड्यांवर ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात १० शासकीय तर ७४ खाजगी टँकरचा समावेश आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक २४ टँकर सुरू असून त्या पाठोपाठ अर्धापूर शहरात १७, नांदेड तालुक्यात १३ टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे.जिल्ह्यात केवळ १६ टक्के जलसाठाजिल्ह्यात असलेल्या एकूण प्रकल्पांत केवळ १६.१९ टक्के जलसाठा शिल्लक उरला आहे. यात जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत २३.१६६ दलघमी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पांत ३७.७१, तीन उच्च पातळी बंधाऱ्यात २०.८३ आणि ८८ लघुप्रकल्पांत २४.८० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पातील मानार प्रकल्पात ५.२३ तर विष्णूपुरी प्रकल्पात ७.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई