शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:06 IST

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.

ठळक मुद्दे३६० अधिग्रहणे : २७ गावांची तहान टँकरवर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत ३६० विहिरी, बोअरचे अधिग्रहणही केले आहे.यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या अवघा ६७ टक्के पाऊस झाला. त्यातही किनवट, माहूरसारख्या तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प राहिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे तपमानाचा पारा ४० हून अधिक असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत असल्याने जिल्हाभरात टंचाईची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. टंचाईबरोबरच प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढत आहे.तसेच अधिग्रणासाठीचे प्रस्तावही दाखल होत आहेत. टंचाई उपाययोजनासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६२ गावे आणि २७ वाड्यावर विहिरी, बोअरची ३६० अधिग्रहणे करण्यात आली आहे.तालुकानिहाय अधिग्रहणाची संख्या पाहिली असता नांदेड तालुक्यातील १२ गावांमध्ये १७ अधिग्रहणे करण्यात आली आहे. अर्धापूर ३५ गावांमध्ये ४०, मुदखेड २० गावांमध्ये ३५, भोकर ८ गावांमध्ये ८, उमरी ४ गावांमध्ये ५, हदगाव ५६ गावांमध्ये ८०, बिलोली १७ गावांमध्ये २२, नायगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ४, मुखेड १६ गावांमध्ये २४, कंधार २ गावांमध्ये २, लोहा ३२ गावांमध्ये ४०, किनवट ३६ गावांमध्ये ४४ तर माहूर तालुक्यातील २० गावांमध्ये ३८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत.याबरोबरच लोहा तालुक्यातील वाड्यामध्ये १०, मुखेड ५, हदगाव ४, अर्धापूर आणि माहूर प्रत्येकी ३ तर किनवट तालुक्यातील २ वाड्यांवर जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाने संभाव्य उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १४४७ अधिग्रहणे प्रस्तावित केली असून प्रस्तावित अधिग्रहणात सर्वाधिक १८४ अधिग्रहणांची संख्या मुखेड तालुक्यात आहे तर कंधार १५७, हिमायतनगर ८२, हदगाव १३८, भोकर १०२, लोहा ८६ किनवट तालुक्यात ११५ अधिग्रहणे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.ग्रामीण भागात टँकरची वाढती मागणीपाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना सोसाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागणी येताच संबंधित ठिकाणी टँकर देण्यास सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत २७ गावे आणि २६ वाड्यांवर ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात १० शासकीय तर ७४ खाजगी टँकरचा समावेश आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक २४ टँकर सुरू असून त्या पाठोपाठ अर्धापूर शहरात १७, नांदेड तालुक्यात १३ टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे.जिल्ह्यात केवळ १६ टक्के जलसाठाजिल्ह्यात असलेल्या एकूण प्रकल्पांत केवळ १६.१९ टक्के जलसाठा शिल्लक उरला आहे. यात जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत २३.१६६ दलघमी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पांत ३७.७१, तीन उच्च पातळी बंधाऱ्यात २०.८३ आणि ८८ लघुप्रकल्पांत २४.८० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पातील मानार प्रकल्पात ५.२३ तर विष्णूपुरी प्रकल्पात ७.४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई