शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

... तर पथकप्रमुख जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:39 AM

उपलब्ध झालेले पाणी अवैधरित्या उपसा होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देअवैध उपसा रोखण्यासाठी पुन्हा कंबर कसली, दहा दक्षता पथके

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध झालेला जलसाठा आता संरक्षित करण्याची जबाबदारी असून या पाण्यावर नांदेडकरांची तहान भागणार आहे. उपलब्ध झालेले पाणी अवैधरित्या उपसा होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी दिले. त्यातच उपसा झाल्यास पथक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा अवैध उपसामुळे झपाट्याने घटला. राजकीय दबावामुळे हा जलसाठा प्रशासन संरक्षित करु शकले नाही. याचा फटका सामान्य माणसाला बसला. राजकीय हेतूने अवैध उपसा करणाऱ्यावर कारवाई करु दिली नाही. परिणामी दक्षिण नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसंकट उभे राहिले आहे. त्यातच निसर्गानेही अवकृपा केली आहे. जुलैची १० तारीख उजाडली तरीही पाण्याचा थेंब नाही. विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण करण्यात आलेले राजकीय जलसंकट वरुण राजा कधी दूर करेल, याची प्रतीक्षा लागली आहे.विष्णूपुरी कोरडी पडल्याने सिद्धेश्वर प्रकल्पातून जवळपास १२० कि.मी. अंतरावरुन कॅनॉलमार्गे पाणी आणण्यात आले. १५ पैकी केवळ २.१७ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे. सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी १३ जुलै रोजी बंद होणार आहे. हा उपलब्ध जलसाठा संरक्षित करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे. हीच बाब ओळखून महापालिका आयुक्त माळी यांनी दक्षता पथकांची बैठक घेतली. या बैठकीत पाण्याचे महत्त्व विशद करताना पर्यायी मार्ग आता उपलब्ध नाही. त्यामुळे सिद्धेश्वरमधून आलेले पाणी जुलैअखेरपर्यंत कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.दक्षता पथकांनी अवैध पाणी उपसा करणाºयाविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.नदीपात्राच्या दोन्ही बाजूला चार-चार पथके राहणार आहेत तर दोन भरारी पथके आहेत. त्यासोबतच १३ जुलै रोजी सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. त्यामुळे या भागात तैनात करण्यात आलेली पथकेही आता विष्णूपुरी प्रकल्पातील जतन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. एकूणच पाण्याचे महत्त्व आता प्रशासनाला उमगले आहे.विभागीय आयुक्तांनी फटकारलेविष्णूपुरी प्रकल्पातील अवैध पाणी उपशास जबाबदार कोण? या विषयावरुन राजकारण केले जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. डी.पी. सावंत यांनी पाणी जतन करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयावर कारवाईची मागणी केली तर खा. हेमंत पाटील यांनी महापालिकेच्या नियोजनाअभावीच नांदेडवर जलसंकट ओढवल्याचे सांगितले. या अवैध पाणी उपसा रोखण्यास जबाबदार कोण? याची चौकशी विभागीय आयुक्त करतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.चौकशी सुरू होण्यापूर्वीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाला फटकारताना डिसेंबरमध्ये ४२ दलघमी पाणी असताना ते पाणी गेले कुठे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पत्रानंतर जिल्हा प्रशासनासह महापालिकाही खडबडून जागी झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण