सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:40 AM2018-10-27T00:40:09+5:302018-10-27T00:40:34+5:30

केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे

The struggle continues until the ruling withdrawal | सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

Next
ठळक मुद्देभोकर येथे जनसंघर्ष यात्रा : अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण केले़ शहरातील मोंढा मैदानात काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी विराट जाहीर सभेचे आयोजन केले होते़ यावेळी ते बोलत होते.
मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आ. अमिता चव्हाण, प्रा.बालाजी गाढे, बी. आर. कदम, गोविंदराव नागेलीकर, जगदीश पाटील भोसीकर, आप्पाराव सोमठाणकर, गणपतराव तिडके, प्रकाशराव देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, गोविंदबाबा गौड, सभापती झिमाबाई चव्हाण, नगराध्यक्ष संगिता चिंचाळकर, मंगाराणी अंबुलगेकर, भारतीबाई पवार, शेख युसूफ, नरसारेड्डी गोपीडवाड, पप्पू पाटील कोंडेकर आदी उपस्थित होते़
खा.चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळेच सरकार या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन अडचणी आणत आहे़ जिल्ह्यात अकराशे डीपी बंद कसे ?, गुळगुळीत रस्त्याचा दावा करणाऱ्या नितीन गडकरींना नांदेड ते भोकर रस्ता दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला. या सरकारने साडेचार वर्षांत शेतकºयांना काय दिले ? असे विचारुन इंग्रजांना काँग्रेसने जसे देशाबाहेर हाकलले तसे बोंडअळी, पीकविमा, कर्जमाफी यात शेतकºयांची घोर निराशा करणाºया सरकारला काँग्रेस सत्तेबाहेर फेकेल. आरक्षणाच्या बाबतीतही धनगर समाजाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. अमिता चव्हाण यांनी सभेत सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेवून येणाºया काळात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.
सरकारची अवस्था बोंडअळीसारखी - विखे पाटील
विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकारची अवस्था बोंडअळीसारखीच झाली आहे़ कारण, कापूसही नाही अन् बोंडअळी नुकसान भरपाईही नाही. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या भीतीने सरकारने १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेल्याची घटना या सरकारच्या काळात घडली. शेतक-यांना मदत देताना निकष लावले जातात़ तर मोठे उद्योगपती पळून गेले तेव्हा निकष कुठे होते ? सरकार धनदांडगे, पुंजीपतींचे असून छत्रपतींचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारने स्मारकाची उंची कमी केली़ छत्रपतींचा अवमान करणारे सरकार शेतक-यांचा काय मान करणार, असेही ते म्हणाले़

Web Title: The struggle continues until the ruling withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.