शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:20 AM

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयानंतर कामाला होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.शहर स्वच्छता निविदाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात एकदा नव्हे, तर दोनदा याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची होती. त्याखालोखाल बंगळूरच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांचे दर होते. मात्र दुसqया क्रमांकाचे दर असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी १२ डिसेंबर २०१७ आणि २९ जानेवारी २०१८ अशा दोन वेळा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेचा अंतिम निकाल १४ फेब्रुवारी रोजी लागला. त्यामध्ये महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. महापालिकेची प्रक्रिया योग्य ठरविली. परिणामी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास शहर स्वच्छतेच्या कामास प्रारंभ करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार सदर कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.कचºयाचे संकलन करणे, रहिवासी, निवास, हॉटेल, आठवडी बाजार, कत्तलखाना आदी ठिकाणाहून घनकचरा, रिक्षा, आॅटो, टिप्पर, ट्रॅक्टरने संकलित करणे तसेच दैनंदिन रस्ते सफाई व नालेसफाईसाठी कामगार पुरवणे ही मुख्य जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे. त्याचवेळी घनकचºयासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रस्ते सफाईतून जमा झालेला कचरा उचलून नेणे, शहर कचरामुक्त करणे, कचरा उचलणाºया सर्व गाड्यांना जीपीए सिस्टीम बसविणे व ते मनपा कार्यालयातील नियंत्रण कक्षात जोडणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी सुविधा द्यावी लागणार आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी व डंपिंग ग्राऊंडला टाकण्यासाठी सदर कंत्राटदारास जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत. प्रारंभी तीन महिने जुन्या वाहनांतून कचरा उचलण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र टाटा एस-९०, टाटा-४०७ टेंपो-२०, रिफ्यूज कॉम्पॅक्टर-६, जेसीबी-१, डंबर प्लेसर-२ आणि एक ट्रॅक्टर असे जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करावी लागणार आहे.या वाहनांवर ३५३ मजूरही ठेकेदाराला उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शहरातून उचलणारा प्रतिटन कचरा हा १६३१ रुपये दराने उचलला जाणार आहे.