शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नांदेडमध्ये पाण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:28 AM

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे.

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले असून सोमवारी बैठकीत आढावा घेतला. ईदनिमित्त दोन दिवस मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशावर वेळीच निर्बंध न घातल्याने शहराला आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विशेषत: दक्षिण नांदेड तहानलेले आहे. १ जूनपासून महापालिकेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच पाण्यासाठी नांदेडकरांना चार दिवस वाट पहावी लागत आहे.महापौरपद स्वीकारल्यानंतर दीक्षा धबाले यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची पहिली बैठक घेतली. यात धबाले यांनी उपलब्ध पाणी किती आणि हे पाणी किती दिवस पुरेल याचा आढावा घेतला. त्यात आता दोन दिवसांवर मुस्लिम बांधवांची ईद आली आहे. या सणासाठी मुस्लिमबहुल भागात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आढावा बैठकीस सभापती फारुख अली खान, आयुक्त लहुराज माळी, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगरसेवक उमेश चव्हाण, दीपक पाटील, किशन कल्याणकर, रमेश गोडबोले, सदाशिव पुरी, फारुख बदवेल, विजय येवनकर, राजू येन्नम, उपअभियंता संघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.या बैठकीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी आयुक्तांसह विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील पंपगृहास भेट दिली. विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेल्याने पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. या चरातून पाणी पंपगृहापर्यंत सध्या पोहोचत आहे.प्रकल्पातील जिवंत जलसाठ्यातून चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. हा मृतजलसाठा उचलण्यासाठी यंत्र सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. कोटीतीर्थ पंपगृहात आणि काळेश्वर येथील पंपगगृहात सध्या जिवंत जलसाठ्यातील पाणी उचलले जात आहे. त्यानंतर मृत जलसाठा घेतला जाणार आहे. हा मृत जलसाठा नेमका किती आहे? याबाबत स्पष्टपणे सांगायला कोणीही धजावत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत जलसाठ्यातून किती दिवस तहान भागेल हाही प्रश्न आहे. या पाहणीदरम्यान, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उमेश पवळे, राजू काळे, किशोर स्वामी, आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.सात वर्षांनंतर मृत जलसाठा उचलणारशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पातून २०१३ मध्ये मृत जलसाठा उचलण्यात आला होता. त्यानंतर २०१९ मध्ये हा मृत जलसाठा उचलण्याची वेळ मनपावर आली आहे. मृत जलसाठा उचलण्यासाठी १० विद्युतपंप तयार ठेवले आहेत. जिवंत जलसाठा संपताच मृत जलसाठा घेतला जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcommissionerआयुक्तMayorमहापौरvishnupuri damविष्णुपुरी धरण