शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दक्षिण नांदेडाला २५ मेपर्यंतचाच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:41 AM

विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देपथके नावालाच, पाण्याचा उपसा सुरुचमृतसाठा उपलब्ध होण्याबाबतही साशंकता

नांदेड : विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.नांदेड शहराला पाणीपुरवठा होणा-या विष्णूपुरी प्रकल्पातील अवैध पाणीउपसा रोखण्याचा विषय आॅक्टोबरपासून चर्चेत आहे. उपाययोजनाही केल्या जात आहेत. पण त्या उपाययोजना यशस्वी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गांधी जयंती दिनी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यत प्रकल्प परिसरातील बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी २५ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीनंतर झाली. पण त्यातही शेतकºयांनी वेगवेगळ्या क्लुप्त्याद्वारे वीजपुरवठा घेत पाणी उपसा सुरुच ठेवला आहे. केवळ तीन टक्के पाणी उरल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार, कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, पोफळे आदी अधिकारी मंगळवारी विष्णूपुरी प्रकल्प परिसरात पोहोचले. यावेळी दोनशे ते अडीचशे पंपाद्वारे पाणीउपसा सुरु असल्याचे वास्तव चित्र दिसले. पोलिसांच्या मदतीने या पथकाने विद्युतपंपाचे वायर जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी गावकºयांनी विरोधही केला. यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने गावक-यांच्या रोषाला अधिका-यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तातच कारवाई केली जाणार आहे.प्रत्यक्षात विष्णूपुरी प्रकल्पातून प्रतिदिन ०.२६ दलघमी पाणी कमी होत आहे. महापालिका केवळ ०.१३ दलघमी पाणी घेत आहे. ०.८ दलघमी पाणी एमआयडीसी, ०.३ दलघमी पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी घेतले जात आहे. उर्वरित ०.१३ दलघमी पाणी कुठे जात आहे, याचा उलगडा मंगळवारी अधिकाºयांना झाला. त्यानंतर आता पुन्हा आहे ते पाणी कसे जतन करायचे यावर मंथन केले जात आहे.राजकीय हस्तक्षेपामुळे दक्षिण नांदेडचा पाणीप्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मृतसाठ्यातून पाणी उपलब्ध न झाल्यास कोणताही पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण नांदेडकरांना मात्र आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.दरम्यान, शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़ दोन दिवसापूर्वी तरोडा खू़ भागातील सिद्धांतनगरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता़ त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता़प्रकल्पात गाळ किती यावरच पुढील निर्णयविष्णूपुरीतील जीवंत जलसाठा संपल्यानंतर मृत जलसाठा उचलण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. कोटीतीर्थ आणि काळेश्वर येथील विहिरीमध्ये दहा पंपाने पाणी घेतले जाणार आहे. त्यातून जवळपास १५ दिवस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.मृतसाठ्यातून पाणी घेण्याची तयारी केली जात असताना प्रत्यक्षात मृत जलसाठा किती उपलब्ध होईल, याबाबत आता साशंकता आहे. दोन ते अडीच दलघमी पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात प्रकल्पात गाळ किती आहे, यावरच सर्व काही अवलंबून आहे.आता बैठ्या पथकाद्वारे पाण्याची राखणही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आता विष्णूपुरी प्रकल्प परिसरात दोन्ही बाजुंच्या आठ गावांमध्ये आता बैठे पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. हे पथक केवळ पाणी कुठे उपसले जात आहे याची माहिती अधिका-यांना देणार आहे.पाणी उपसणा-याविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांच्या स्थापनेची प्रक्रिया महापालिका प्रशासन करीत आहे. या पथकात तीन पोलीस कर्मचारी, ५ मजूर, एक वाहन टेम्पो, वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारी समाविष्ठ राहणार आहे. या पथकाद्वारे पाणी उपसा थांबेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणelectricityवीजFarmerशेतकरी