शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

मुदखेडातील सीता नदी पडली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST

या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई संकट इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीवन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

मुदखेड : या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शासनाने या बाबतीत गंभीर दखल घेऊन या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीतानदीला तात्काळ सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.मुदखेड तालुक्यातील मुदखेड, बारड, निवघा, शेंबोली, पांढरवाडी, डोंगरगाव, पार्डी, वैजापुर, बोरगाव हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. इसापूर धरणातील पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके भाजीपाला घेत सुखी समाधानी जिवन जगतो आहे. परंतु या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते.मे च्या कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीता नदीत सोडावे अशी एकमुखी मागणी होत आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सीता नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. बोरवेल बंद पडले आहेत.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसराला बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाºया गावांना होणारा जलपुरवठा पुर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे.पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील शेतक-यांकडून होत आहे.केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्यासीता नदीला पाणी सोडले नाही तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनवरांचे प्रमाण फार मोठे आहे.प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, केळीच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे.स्तसेच शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे.

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई