शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

मुदखेडातील सीता नदी पडली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST

या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई संकट इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीवन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

मुदखेड : या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शासनाने या बाबतीत गंभीर दखल घेऊन या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीतानदीला तात्काळ सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.मुदखेड तालुक्यातील मुदखेड, बारड, निवघा, शेंबोली, पांढरवाडी, डोंगरगाव, पार्डी, वैजापुर, बोरगाव हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. इसापूर धरणातील पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके भाजीपाला घेत सुखी समाधानी जिवन जगतो आहे. परंतु या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते.मे च्या कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीता नदीत सोडावे अशी एकमुखी मागणी होत आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सीता नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. बोरवेल बंद पडले आहेत.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसराला बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाºया गावांना होणारा जलपुरवठा पुर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे.पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील शेतक-यांकडून होत आहे.केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्यासीता नदीला पाणी सोडले नाही तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनवरांचे प्रमाण फार मोठे आहे.प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, केळीच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे.स्तसेच शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे.

टॅग्स :Nandedनांदेडriverनदीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई