शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धक्कादायक ! हदगावात जिल्हा परिषद शाळेसमोरच होतो अंत्यविधी; भीतीने विद्यार्थी पडतात आजारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:48 IST

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देबरडशेवाळा येथील स्मशानभूमी तळ्याच्या काठी असून ती उघड्यावर आहे़शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे अंतर शाळेपासून १०० मीटरपेक्षा कमी आहे.

- सुनील चौरे 

नांदेड : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोमवारी एका महिलेचा शाळेसमोरच अंत्यविधी उरकण्यात आला. यामुळे शाळा वेळेपूर्वीच सोडून द्यावी लागली.

बरडशेवाळा येथील स्मशानभूमी तळ्याच्या काठी असून ती उघड्यावर आहे़ येथे इरिगेशन कॅम्प असल्यामुळे त्या काळी येथे जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आली़ शाळेच्या बाजूला अंगणवाडीही आहे़ विशेष म्हणजे, शाळा व अंगणवाडी डिजिटल झाली़ शाळेला मैदान असल्यामुळे लहान-लहान विद्यार्थी सकाळ - दुपारच्या दरम्यान खेळत असतात़ शाळेच्या शेजारीच वीटभट्टीचे कारखाने आहेत. यातच शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. यामुळे येथे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अनंत अडचणी येतात.

विद्यार्थ्यांसमोरच होतो अंत्यविधीशाळेसमोरच स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे अंतर शाळेपासून १०० मीटरपेक्षा कमी आहे.  त्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना दिसते़ त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात भीती निर्माण झाली़ स्मशानभूमीचे बांधकाम झाले नाही़ तसेच शाळेलाही संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीच्या जागेत बदल करावा,अशी मागणी होत असली याकडे दुर्लक्ष होत आहे. एकूणच हा प्रकार बालमनावर विपरित करणारा असून संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे़ या संदर्भात शाळेतील शिक्षकांनी सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार विनंती करून शाळेसमोर अंत्यविधी करू नका असे सूचविले़ मात्र त्यांचे कोणीही ऐकत नाही़ 

मैदानात बाजारसुद्धा भरतो  याशिवाय शाळेच्या प्रांगणातच सोमवारी सायंकाळी बाजार भरतो़ बाजारानिमित्ताने झालेला कचरा कोणीही उचलत नाही. यासोबतच शाळेच्या बाजूलाच एका स्मशानभूमीचे बांधकाम झाले़ आहे. मात्र तिथे एका विशिष्ट समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी होतो़ अन्य समाजाच्या स्मशानभूमीलाही ठरावीक जागा आहे़ मात्र एकाचेही काम पूर्ण झालेले नाही़ 

भीतीमुळे विद्यार्थी पडतात आजारीबरडशेवाळा येथील विद्यार्थीच शाळेत शिक्षण घेतात़ अंत्यसंस्काराचे वातावरण पाहून शिक्षक लवकर शाळा सोडून देतात़ भीतीमुळे अनेकदा विद्यार्थी आजारीही पडले आहेत- प्रभाकर दहीभाते, ग्रामस्थ़ 

गंभीर प्रकार हा प्रकार गंभीर आहे़ शाळेला संरक्षक भिंत आवश्यक आहे़ त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला अनेकवेळा देण्यात आला़ मात्र कामाला मंजुरी मिळाली नाही- प्रेम मस्के, ग्रामपंचायत सदस्य़ 

पूर्वी वस्ती नव्हती, आता वस्तीस्मशानभूमी परिसरात सुरुवातीला वस्ती नव्हती़ आता वस्ती वाढल्याने ती मध्यभागी झाली़ शाळेला संरक्षक भिंत बांधणे हाच एकमेव उपाय आहे. - भीमराव नरोटे, ग्रा़ पं़ सदस्य, बरडशेवाळा़

प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला युडायसमध्ये शाळेने संरक्षक भिंतीची मागणी केली होती. आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला़ यावर्षी मान्यता मिळेल -  वैशाली आडगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी बरडशेवाळा़

टॅग्स :Deathमृत्यूSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायत