शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धक्कादायक ! हदगावात जिल्हा परिषद शाळेसमोरच होतो अंत्यविधी; भीतीने विद्यार्थी पडतात आजारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:48 IST

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देबरडशेवाळा येथील स्मशानभूमी तळ्याच्या काठी असून ती उघड्यावर आहे़शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे अंतर शाळेपासून १०० मीटरपेक्षा कमी आहे.

- सुनील चौरे 

नांदेड : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा (ता़ हदगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोमवारी एका महिलेचा शाळेसमोरच अंत्यविधी उरकण्यात आला. यामुळे शाळा वेळेपूर्वीच सोडून द्यावी लागली.

बरडशेवाळा येथील स्मशानभूमी तळ्याच्या काठी असून ती उघड्यावर आहे़ येथे इरिगेशन कॅम्प असल्यामुळे त्या काळी येथे जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आली़ शाळेच्या बाजूला अंगणवाडीही आहे़ विशेष म्हणजे, शाळा व अंगणवाडी डिजिटल झाली़ शाळेला मैदान असल्यामुळे लहान-लहान विद्यार्थी सकाळ - दुपारच्या दरम्यान खेळत असतात़ शाळेच्या शेजारीच वीटभट्टीचे कारखाने आहेत. यातच शाळेसमोरच स्मशानभूमी आहे. यामुळे येथे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अनंत अडचणी येतात.

विद्यार्थ्यांसमोरच होतो अंत्यविधीशाळेसमोरच स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे अंतर शाळेपासून १०० मीटरपेक्षा कमी आहे.  त्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना दिसते़ त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात भीती निर्माण झाली़ स्मशानभूमीचे बांधकाम झाले नाही़ तसेच शाळेलाही संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीच्या जागेत बदल करावा,अशी मागणी होत असली याकडे दुर्लक्ष होत आहे. एकूणच हा प्रकार बालमनावर विपरित करणारा असून संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे़ या संदर्भात शाळेतील शिक्षकांनी सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार विनंती करून शाळेसमोर अंत्यविधी करू नका असे सूचविले़ मात्र त्यांचे कोणीही ऐकत नाही़ 

मैदानात बाजारसुद्धा भरतो  याशिवाय शाळेच्या प्रांगणातच सोमवारी सायंकाळी बाजार भरतो़ बाजारानिमित्ताने झालेला कचरा कोणीही उचलत नाही. यासोबतच शाळेच्या बाजूलाच एका स्मशानभूमीचे बांधकाम झाले़ आहे. मात्र तिथे एका विशिष्ट समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी होतो़ अन्य समाजाच्या स्मशानभूमीलाही ठरावीक जागा आहे़ मात्र एकाचेही काम पूर्ण झालेले नाही़ 

भीतीमुळे विद्यार्थी पडतात आजारीबरडशेवाळा येथील विद्यार्थीच शाळेत शिक्षण घेतात़ अंत्यसंस्काराचे वातावरण पाहून शिक्षक लवकर शाळा सोडून देतात़ भीतीमुळे अनेकदा विद्यार्थी आजारीही पडले आहेत- प्रभाकर दहीभाते, ग्रामस्थ़ 

गंभीर प्रकार हा प्रकार गंभीर आहे़ शाळेला संरक्षक भिंत आवश्यक आहे़ त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला अनेकवेळा देण्यात आला़ मात्र कामाला मंजुरी मिळाली नाही- प्रेम मस्के, ग्रामपंचायत सदस्य़ 

पूर्वी वस्ती नव्हती, आता वस्तीस्मशानभूमी परिसरात सुरुवातीला वस्ती नव्हती़ आता वस्ती वाढल्याने ती मध्यभागी झाली़ शाळेला संरक्षक भिंत बांधणे हाच एकमेव उपाय आहे. - भीमराव नरोटे, ग्रा़ पं़ सदस्य, बरडशेवाळा़

प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला युडायसमध्ये शाळेने संरक्षक भिंतीची मागणी केली होती. आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला़ यावर्षी मान्यता मिळेल -  वैशाली आडगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी बरडशेवाळा़

टॅग्स :Deathमृत्यूSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायत