शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सात गावांत भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:02 AM

वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनांदेड-वर्धा रेल्वेमार्ग : अर्धापूर तालुक्यात भूसंपादनाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.नांदेड-वर्धा या प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि हदगाव या दोन तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन केले जात आहे. महसूल विभागाकडून ही प्रक्रिया वेगाने केली जात असली तरी रेल्वे विभागाकडून मात्र महसूल विभागाने संपादित केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणत्याही हालचाली अद्याप सुरू झाल्या नाहीत. यामुळे महसूल विभागाने संपादित केलेली जमीन कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.अर्धापूर तालुक्यातील चिंचवण येथील ०.८० कि.मी. जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासह पार्डी मक्ता येथील २ कि.मी. साठी ७ आर, कारवाडी येथील ६ किमीसाठी २.४६ आर, अमरापूर येथील १.२३ किमीसाठी ६.७२ आर, हमरापूर येथील १.६८ किमीसाठी १०.११ आर, बारसगाव येथे १.५७ किमीसाठी १२.१४ आर आणि लतीफपूर येथील २.२५ किमीसाठी ५.४२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे.या जमिनीसाठी लागणारी संयुक्त मोजणी करण्यात आली आहे. तसेच मावेजा वाटप करुन ताबाही घेण्यात आला आहे.अर्धापूर तालुक्यातील देगाव (बु) येथे २.६७ किमी अंतरासाठी ७.८५ आर, यमशेटवाडी येथे ०.३७ कि.मी. अंतरासाठी २.१९ आर, येळेगाव येथे २३.८९ किमीसाठी ३४.३० आर आणि अर्धापूर येथे ३७.९६ आर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.नांदेड-वर्धा रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील ४४.२५ कि.मी. रेल्वे मार्गासाठी ११७.५१ आर जमीन संपादित केली जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेFarmerशेतकरी