शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने ...

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या. दरम्यानच्या काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला. सध्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात येत नसल्याने विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतील २४० महाविद्यालयांची संख्या असून या महाविद्यालयांत शिकणाऱ्या ९९ हजारांवर विद्यार्थ्यांना महाविद्यालये उघडण्याची प्रतीक्षा आहे. मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असून त्यामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. कारण पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही.

- दिनेश बत्तलवाड, विद्यार्थी

एकीकडे शासन चित्रपटगृह सुरू करत आहे. प्रार्थनास्थळे सुरू करत आहे. दळणवळणाची साधनेही सुरू झाली आहेत. मग महाविद्यालये सुरू करण्यास कोणती अडचण येत आहे? सर्वात अगोदर महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे.

- शीतल महाजन, विद्यार्थी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्व गर्दीची ठिकाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयेसुद्धा सुरू करण्यास हरकत नाही. शासनाने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.

- प्रियंका गायकवाड, विद्यार्थी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करावीत. कारण मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हे वर्षसुद्धा गोंधळाचे जाऊ नये, यासाठी आता महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे.

- अष्टगाथा कावळे, विद्यार्थी