शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने ...

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या. दरम्यानच्या काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला. सध्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात येत नसल्याने विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतील २४० महाविद्यालयांची संख्या असून या महाविद्यालयांत शिकणाऱ्या ९९ हजारांवर विद्यार्थ्यांना महाविद्यालये उघडण्याची प्रतीक्षा आहे. मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असून त्यामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. कारण पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही.

- दिनेश बत्तलवाड, विद्यार्थी

एकीकडे शासन चित्रपटगृह सुरू करत आहे. प्रार्थनास्थळे सुरू करत आहे. दळणवळणाची साधनेही सुरू झाली आहेत. मग महाविद्यालये सुरू करण्यास कोणती अडचण येत आहे? सर्वात अगोदर महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे.

- शीतल महाजन, विद्यार्थी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्व गर्दीची ठिकाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयेसुद्धा सुरू करण्यास हरकत नाही. शासनाने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.

- प्रियंका गायकवाड, विद्यार्थी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करावीत. कारण मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हे वर्षसुद्धा गोंधळाचे जाऊ नये, यासाठी आता महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे.

- अष्टगाथा कावळे, विद्यार्थी