शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने ...

कोरोना महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करावी लागली. ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या. दरम्यानच्या काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला. सध्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात येत नसल्याने विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतील २४० महाविद्यालयांची संख्या असून या महाविद्यालयांत शिकणाऱ्या ९९ हजारांवर विद्यार्थ्यांना महाविद्यालये उघडण्याची प्रतीक्षा आहे. मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असून त्यामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची गरज आहे. कारण पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मात्र शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही.

- दिनेश बत्तलवाड, विद्यार्थी

एकीकडे शासन चित्रपटगृह सुरू करत आहे. प्रार्थनास्थळे सुरू करत आहे. दळणवळणाची साधनेही सुरू झाली आहेत. मग महाविद्यालये सुरू करण्यास कोणती अडचण येत आहे? सर्वात अगोदर महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे.

- शीतल महाजन, विद्यार्थी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्व गर्दीची ठिकाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयेसुद्धा सुरू करण्यास हरकत नाही. शासनाने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.

- प्रियंका गायकवाड, विद्यार्थी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करावीत. कारण मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हे वर्षसुद्धा गोंधळाचे जाऊ नये, यासाठी आता महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे.

- अष्टगाथा कावळे, विद्यार्थी