शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:34 IST

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक कुमार केतकर, राजू वाघमारे, कमलकिशोर कदम यांचा आरोप

नांदेड : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. हे बरळत नाहीत तर ठरवून बोलतात, असे सांगत राष्टÑीय स्वयंसेवक संघ, भाजपाकडून घटनेला धोका असून या संघटनांचे मनुस्मृती आधारित व्यवस्था आणण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. कुमार केतकर यांच्यासह राजू वाघमारे, कमलकिशोर कदम नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी कमलकिशोर कदम म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे देशावरील सर्वात मोठे संकट आहे. देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाच्या वर्तनावरुन स्पष्ट होत आहे. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील पाच वर्षे केवळ खोटे बोलून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम केले. भाजपाचे लोक देशवासियांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कमलकिशोर कदम यांनी केला. काँग्रेससोबत काही ठिकाणी आमचे वैचारिक मतभेदही होतात. मात्र वैयक्तिक पातळीवर येवून आम्ही कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत खा. अशोकराव चव्हाण यांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे कदम म्हणाले.खा. कुमार केतकर यांनीही भाजपाचा समाचार घेतला. देशात काँग्रेसमुळेच विकास झाल्याचे सांगत नांदेडलाही शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यानेच या भागाचा कायापालट झाल्याचे ते म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी शंकरराव चव्हाणांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे सरकार सर्वस्तरातील नागरिकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करीत आहे. मोदी, शहा यांची ही हुकूमशाहीची राजवट बाजूला सारुन सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला बळ देण्याची आवश्यकता केतकर यांनी व्यक्त केली.राजू वाघमारे यांनी विद्यमान भाजपा सरकार रिझर्व्ह बँक, सीबीआय यासारख्या देशातील सार्वजनिक संस्था मोडीत काढून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतरही खुद्द पंतप्रधानच शहीद जवानांच्या आडून भाजपाला मते मागत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भाजपाच्या अशा पद्धतीच्या वर्तवणुकीमुळे देशात लोकशाहीचा खून होत असल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपाप्रणीत असलेल्या एका सहयोगी संस्थेकडूनच संसदेपासून अगदी काही अंतरावर भारतीय राज्यघटना जाळण्याचे पाप झाले. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकाराबाबत ना मोदी काही बोलले, ना अमित शहा. अशा प्रकारे चुप्पी साधून एकप्रकारे भाजप राज्यघटनेला विरोध करणाऱ्यांना मूक पाठिंबाच देत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.विकासाची दृष्टी काँग्रेसकडेचदेशात टीव्ही, मोबाईल काँग्रेसच्या राजीव गांधींनी आणून आधुनिक क्रांती केली. मात्र मागील पाच वर्षांत विकासाची ही प्रक्रिया थांबली आहे.भाजपाकडून दुहीचे राजकारणसर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. मात्र जाती, धर्मात तेढ वाढवून भाजपा देशात दुहीचे राजकारण करत आहे.अशोक चव्हाणच सक्षम नेतृत्वपाच वर्षांतील युतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण हेच सक्षम नेतृत्व आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण