नांदेड : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. हे बरळत नाहीत तर ठरवून बोलतात, असे सांगत राष्टÑीय स्वयंसेवक संघ, भाजपाकडून घटनेला धोका असून या संघटनांचे मनुस्मृती आधारित व्यवस्था आणण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. कुमार केतकर यांच्यासह राजू वाघमारे, कमलकिशोर कदम नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी कमलकिशोर कदम म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे देशावरील सर्वात मोठे संकट आहे. देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाच्या वर्तनावरुन स्पष्ट होत आहे. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील पाच वर्षे केवळ खोटे बोलून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम केले. भाजपाचे लोक देशवासियांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कमलकिशोर कदम यांनी केला. काँग्रेससोबत काही ठिकाणी आमचे वैचारिक मतभेदही होतात. मात्र वैयक्तिक पातळीवर येवून आम्ही कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत खा. अशोकराव चव्हाण यांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे कदम म्हणाले.खा. कुमार केतकर यांनीही भाजपाचा समाचार घेतला. देशात काँग्रेसमुळेच विकास झाल्याचे सांगत नांदेडलाही शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यानेच या भागाचा कायापालट झाल्याचे ते म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी शंकरराव चव्हाणांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे सरकार सर्वस्तरातील नागरिकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करीत आहे. मोदी, शहा यांची ही हुकूमशाहीची राजवट बाजूला सारुन सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला बळ देण्याची आवश्यकता केतकर यांनी व्यक्त केली.राजू वाघमारे यांनी विद्यमान भाजपा सरकार रिझर्व्ह बँक, सीबीआय यासारख्या देशातील सार्वजनिक संस्था मोडीत काढून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतरही खुद्द पंतप्रधानच शहीद जवानांच्या आडून भाजपाला मते मागत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भाजपाच्या अशा पद्धतीच्या वर्तवणुकीमुळे देशात लोकशाहीचा खून होत असल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपाप्रणीत असलेल्या एका सहयोगी संस्थेकडूनच संसदेपासून अगदी काही अंतरावर भारतीय राज्यघटना जाळण्याचे पाप झाले. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकाराबाबत ना मोदी काही बोलले, ना अमित शहा. अशा प्रकारे चुप्पी साधून एकप्रकारे भाजप राज्यघटनेला विरोध करणाऱ्यांना मूक पाठिंबाच देत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.विकासाची दृष्टी काँग्रेसकडेचदेशात टीव्ही, मोबाईल काँग्रेसच्या राजीव गांधींनी आणून आधुनिक क्रांती केली. मात्र मागील पाच वर्षांत विकासाची ही प्रक्रिया थांबली आहे.भाजपाकडून दुहीचे राजकारणसर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. मात्र जाती, धर्मात तेढ वाढवून भाजपा देशात दुहीचे राजकारण करत आहे.अशोक चव्हाणच सक्षम नेतृत्वपाच वर्षांतील युतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण हेच सक्षम नेतृत्व आहे.
संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:34 IST
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.
संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका
ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक कुमार केतकर, राजू वाघमारे, कमलकिशोर कदम यांचा आरोप