शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:34 IST

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक कुमार केतकर, राजू वाघमारे, कमलकिशोर कदम यांचा आरोप

नांदेड : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. हे बरळत नाहीत तर ठरवून बोलतात, असे सांगत राष्टÑीय स्वयंसेवक संघ, भाजपाकडून घटनेला धोका असून या संघटनांचे मनुस्मृती आधारित व्यवस्था आणण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. कुमार केतकर यांच्यासह राजू वाघमारे, कमलकिशोर कदम नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी कमलकिशोर कदम म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे देशावरील सर्वात मोठे संकट आहे. देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाच्या वर्तनावरुन स्पष्ट होत आहे. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील पाच वर्षे केवळ खोटे बोलून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम केले. भाजपाचे लोक देशवासियांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कमलकिशोर कदम यांनी केला. काँग्रेससोबत काही ठिकाणी आमचे वैचारिक मतभेदही होतात. मात्र वैयक्तिक पातळीवर येवून आम्ही कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत खा. अशोकराव चव्हाण यांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे कदम म्हणाले.खा. कुमार केतकर यांनीही भाजपाचा समाचार घेतला. देशात काँग्रेसमुळेच विकास झाल्याचे सांगत नांदेडलाही शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यानेच या भागाचा कायापालट झाल्याचे ते म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी शंकरराव चव्हाणांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे सरकार सर्वस्तरातील नागरिकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करीत आहे. मोदी, शहा यांची ही हुकूमशाहीची राजवट बाजूला सारुन सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला बळ देण्याची आवश्यकता केतकर यांनी व्यक्त केली.राजू वाघमारे यांनी विद्यमान भाजपा सरकार रिझर्व्ह बँक, सीबीआय यासारख्या देशातील सार्वजनिक संस्था मोडीत काढून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतरही खुद्द पंतप्रधानच शहीद जवानांच्या आडून भाजपाला मते मागत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भाजपाच्या अशा पद्धतीच्या वर्तवणुकीमुळे देशात लोकशाहीचा खून होत असल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपाप्रणीत असलेल्या एका सहयोगी संस्थेकडूनच संसदेपासून अगदी काही अंतरावर भारतीय राज्यघटना जाळण्याचे पाप झाले. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकाराबाबत ना मोदी काही बोलले, ना अमित शहा. अशा प्रकारे चुप्पी साधून एकप्रकारे भाजप राज्यघटनेला विरोध करणाऱ्यांना मूक पाठिंबाच देत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.विकासाची दृष्टी काँग्रेसकडेचदेशात टीव्ही, मोबाईल काँग्रेसच्या राजीव गांधींनी आणून आधुनिक क्रांती केली. मात्र मागील पाच वर्षांत विकासाची ही प्रक्रिया थांबली आहे.भाजपाकडून दुहीचे राजकारणसर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. मात्र जाती, धर्मात तेढ वाढवून भाजपा देशात दुहीचे राजकारण करत आहे.अशोक चव्हाणच सक्षम नेतृत्वपाच वर्षांतील युतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण हेच सक्षम नेतृत्व आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण