शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

राज्यघटनेचे संरक्षण करण्याची जवाबदारी समाजाची : पालकमंत्री अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ...

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पीआरपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, समाजात राजकीय वातावरण दूषित झाले आहे. कोणताही घटक सद्य:स्थितीत समाधानी नाही. देशात सुरक्षित वाटत नाही, शाश्वती नाही, न्याय मिळण्याची खात्री नाही. देशासाठी ही बाब लोकशाहीस मारक ठरणारी आहे. शेतकरी आंदोलन उत्तर भारतात होत आहे. दोन महिने आंदोलन चालत असूनही सरकार बधत नाही. सामाजिक उपेक्षा मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकरी हिताचे कायदे करण्याऐवजी धनदांडग्यांच्या हिताचे कायदे केले जात आहेत, या सगळ्या भूमिका अतिशय चिंताजनक आहेत, असे ते म्हणाले.

पत्रकार आशिष जाधव यांना राज्यस्तरीय कृष्णाई पुरस्कार पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र, पत्रकार संभाजी सोनकांबळे यांना जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, प्रेस फोटोग्राफर सचिन डोंगळीकर यांना जिल्हास्तरीय फोटोग्राफी कृष्णाई पुरस्कार पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांच्यावतीने नांदेड येथे कलावंतांचे शिबिर घेतले. त्यात मानांकन मिळविलेल्या कलावंतांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक बापूराव गजभारे यांनी केले. सूत्रसंचालन पंढरीनाथ बोकारे व डॉ. विलास ढवळे यांनी तर आकाश गजभारे यांनी आभार मानले.