शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबला ! नांदेड जिल्ह्यावर भीषण जलसंकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 18:54 IST

जिल्ह्यात केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणीटंचाई कायम ४ कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

नांदेड : जिल्ह्यात असलेल्या १११ जलप्रकल्पांत केवळ २५.९३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यात दोन मोठ्या असलेल्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात २१.४१ टक्के तर मानार प्रकल्पात २३.४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर जलसंकट घोंघावत असून या संकटावर कशी मात करायची? याची चिंता प्रशासनाला लागली आहे. 

जिल्ह्यात १११ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठे प्रकल्प, ९ मध्यम प्रकल्प, आठ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पांची क्षमता ८०४.६२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण प्रत्यक्षात आजघडीला या प्रकल्पामध्ये केवळ १८७.९१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ८८ लघुप्रकल्पात ५८.३६ दलघमी, आठ उच्च पातळी बंधाऱ्यात ४९.४३ दलघी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेले ४ कोल्हापुरी बंधारे कोरडेठाकच आहेत. 

मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी ३५.७६ टक्के इतकी होती. त्यामध्ये सर्वाधिक जलसाठा विष्णूपुरी प्रकल्पात ६६.३ दलघमी इतका होता. मानार प्रकल्पात गतवर्षी १५.५७ दलघमी जलसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र तो दुप्पट आहे. मानार प्रकल्प यंदा ३१.८५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. नांदेड शहरात तर आजघडीला आठ दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे. मे अखेरपासूनच नांदेड शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, नांदेड शहरासाठी पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडेच आहेत. जायकवाडी वगळता येलदरी, सिद्धेश्वर, दुधना आदी प्रकल्प कोरडे असल्याने पाणी आणायचे तरी कोठून? हा प्रश्न उद्भवला आहे.

जायकवाडी प्रकल्प ९५ टक्के भरला असला तरीही या प्रकल्पातून नांदेडसाठी पाणी आणण्यासाठी अद्याप तरी कोणताही निर्णय झाला नाही. जायकवाडीहून पाणी आणायचा निर्णय घेतला तरीही   ही बाब मोठी जिकिरीची ठरणार आहे. गोदावरी पात्रासह तब्बल १२ बंधारे कोरडे आहेत.  त्यामुळे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

जिल्ह्यात आजघडीला सरासरीच्या ४९.२० टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ६० टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात झाला आहे. नांदेड तालुक्यात ४७.५०, अर्धापूर- ४६.६१, भोकर- ४९.२, उमरी- ४६.९८, कंधार- ५३.०८, लोहा- ४४.६९, किनवट तालुक्यात ५२.२९, माहूर- ५१.१६, हदगाव- ४६.२८, हिमायतनगर- ५३.४१, देगलूर- ३६.५१, बिलोली- ५३.१६, धर्माबाद- ५०.४९, नायगाव- ४९.२८ आणि मुखेड तालुक्यात केवळ ४५.८९ टक्के पाऊस झाला आहे. 

सांगवी बंधाऱ्यातून पाण्याचा अपव्ययनांदेड शहरातील लोकप्रतिनिधीही या बाबतीत मूग गिळूनच बसले आहेत. विष्णूपुरी प्रकल्पात केवळ १७.३० दलघमी पाणी शिल्लक आहे. या जलसाठ्यातून दोन महिने तहान भागवली जावू शकते. पण त्याचवेळी जायकवाडी ९५ टक्के भरलेले असताना हे पाणी नांदेडसाठी मिळावे यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नांदेड शहराच्या लोकप्रतिनिधींनीही अद्याप कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परिणामी नांदेडकरांना आजही आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे. विष्णूपुरी प्रकल्प कोरडा असला तरीही शहरासाठी असलेल्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेच्या सांगवी बंधाऱ्यातून मात्र पाणी वाया जात आहे. याकडे महापालिका दुर्लक्षच करीत आहे. 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणNandedनांदेडWaterपाणीRainपाऊस