शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

By श्रीनिवास भोसले | Updated: April 22, 2023 19:12 IST

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बीआरएसची देशभरात व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्रातून आणि त्यातही नांदेड जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील केसीआर यांच्या लागोपाठ दोन सभा झाल्या. त्यानंतर त्यांनी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करून एक प्रकारे मास्टर स्ट्रोक मारला आहे. उभय नेत्यांच्या उपस्थितीत तेलंगणात झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

तेलंगणातील विकास योजनांची भुरळ महाराष्ट्रातील जनतेला पडत आहे. त्यात शेतकरी आणि सामान्यांसाठी असलेल्या योजनांबरोबरच तेलंगणा दलितबंधू योजना लोकप्रिय झाली आहे. शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज, पाणी, अनुदान अशा विविध नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांबाबत महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करण्यासाठी खास नांदेड जिल्ह्याची निवड केली. नांदेड आणि त्यानंतर लोहा येथे सभा घेऊन के. चंद्रशेखर राव यांनी विद्यमान सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. शेतकरी, कष्टकरी, महिला-विद्यार्थ्यांना योग्य सुविधा द्या, मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही, असे आवाहनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते. 

भारत राष्ट्र समितीचा सीमावर्ती भागात असलेल्या तेलगू भाषिक मतदारांवर डोळा असला तरी, त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक घेतले जाणारे कार्यक्रम राज्याच्या राजकारणात बदल घडवून आणणारे ठरू शकतात. आजघडीला तरी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपला बीआरएसच्या एन्ट्रीचा परिणाम भोगावा लागेल, असे चित्र आहे. त्यातच आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेलंगणातील भव्य १२५ फूट उंच कांस्यापासून बनविलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे नातू माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरही चर्चा झाली. विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. आजघडीला वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घेतला जात आहे. परिणामी, भविष्यात आणखीन राजकीय खेळी बदलू शकते.

...तर बदलेल महाराष्ट्रातील राजकारणतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रात अपेक्षित चेहरा अद्याप मिळालेला नाही. तेलंगणातील अराजकीय कार्यक्रमानिमित्त केसीआर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर एकत्र आले. आजघडीला महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे वाढणारा जनकौल आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून केसीआर यांची तेलंगणात तयार झालेली प्रतिमा पाहता दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढविल्या तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडेल, अशा चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत.

शिवसेना (ठाकरे गट) अन् वंचित बहुजन आघाडीचे काय?राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची घडी घट्ट राहावी म्हणून नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, बाजार समित्या आणि इतर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची घडी विस्कटलेली पाहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्या. परंतु, महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घटक पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे भविष्यात वंचित बीआरएससोबत जाऊ शकते. असे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल.

भोकरमध्ये पॅनलभोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या मैदानात भारत राष्ट्र समिती पहिल्यांदाच उतरली आहे. या भागात तेलगू भाषिक मतदार असल्याने भोकर बाजार समितीत उमेदवार देण्याची हिम्मत बीआरएसने केली. परंतू नांदेड, कुंटूर, नायगाव, हिमायतनगर या चार बाजार समित्यांमध्ये अद्याप बीआरएसचे उमेदवार निश्चित झालेेल नाहीत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNandedनांदेडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी