शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

By श्रीनिवास भोसले | Updated: April 22, 2023 19:12 IST

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बीआरएसची देशभरात व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्रातून आणि त्यातही नांदेड जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील केसीआर यांच्या लागोपाठ दोन सभा झाल्या. त्यानंतर त्यांनी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करून एक प्रकारे मास्टर स्ट्रोक मारला आहे. उभय नेत्यांच्या उपस्थितीत तेलंगणात झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

तेलंगणातील विकास योजनांची भुरळ महाराष्ट्रातील जनतेला पडत आहे. त्यात शेतकरी आणि सामान्यांसाठी असलेल्या योजनांबरोबरच तेलंगणा दलितबंधू योजना लोकप्रिय झाली आहे. शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज, पाणी, अनुदान अशा विविध नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांबाबत महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करण्यासाठी खास नांदेड जिल्ह्याची निवड केली. नांदेड आणि त्यानंतर लोहा येथे सभा घेऊन के. चंद्रशेखर राव यांनी विद्यमान सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. शेतकरी, कष्टकरी, महिला-विद्यार्थ्यांना योग्य सुविधा द्या, मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही, असे आवाहनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते. 

भारत राष्ट्र समितीचा सीमावर्ती भागात असलेल्या तेलगू भाषिक मतदारांवर डोळा असला तरी, त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक घेतले जाणारे कार्यक्रम राज्याच्या राजकारणात बदल घडवून आणणारे ठरू शकतात. आजघडीला तरी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपला बीआरएसच्या एन्ट्रीचा परिणाम भोगावा लागेल, असे चित्र आहे. त्यातच आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेलंगणातील भव्य १२५ फूट उंच कांस्यापासून बनविलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे नातू माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरही चर्चा झाली. विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. आजघडीला वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घेतला जात आहे. परिणामी, भविष्यात आणखीन राजकीय खेळी बदलू शकते.

...तर बदलेल महाराष्ट्रातील राजकारणतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रात अपेक्षित चेहरा अद्याप मिळालेला नाही. तेलंगणातील अराजकीय कार्यक्रमानिमित्त केसीआर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर एकत्र आले. आजघडीला महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे वाढणारा जनकौल आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून केसीआर यांची तेलंगणात तयार झालेली प्रतिमा पाहता दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढविल्या तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडेल, अशा चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत.

शिवसेना (ठाकरे गट) अन् वंचित बहुजन आघाडीचे काय?राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची घडी घट्ट राहावी म्हणून नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, बाजार समित्या आणि इतर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची घडी विस्कटलेली पाहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्या. परंतु, महाविकास आघाडीत वंचित नको, असा पवित्रा घटक पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे भविष्यात वंचित बीआरएससोबत जाऊ शकते. असे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल.

भोकरमध्ये पॅनलभोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या मैदानात भारत राष्ट्र समिती पहिल्यांदाच उतरली आहे. या भागात तेलगू भाषिक मतदार असल्याने भोकर बाजार समितीत उमेदवार देण्याची हिम्मत बीआरएसने केली. परंतू नांदेड, कुंटूर, नायगाव, हिमायतनगर या चार बाजार समित्यांमध्ये अद्याप बीआरएसचे उमेदवार निश्चित झालेेल नाहीत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNandedनांदेडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी