शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडेआठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

नांदेड शहरात गेल्या काही दिवसांत बॅग पळविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर दिवसा चाकू आणि बंदुकीचा धाक ...

नांदेड शहरात गेल्या काही दिवसांत बॅग पळविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर दिवसा चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॅग लंपास करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोमेश कॉलनी भागातील गणेश उत्तम पतंगे हा युवक शिवाजीनगर ठाण्यात आला होता. हिंगोली गेट भागात सकाळी साडेनऊ वाजता चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून आपल्याजवळील साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी तातडीने शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पो. नि. अनंत नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यू सोळंके, संजय ननवरे या पोलीस निरीक्षकांची फौज रस्त्यावर उतरली होती. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही शिवाजीनगर ठाण्यात येऊन धडकले. पो.नि. द्वारकादास चिखलीकर यांनी पतंगे यांची उलटतपासणी केली. त्यात देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे बनाव रचल्याचे उघडकीस आले. तसेच रकमेतील ३ लाख २० हजार रुपये बँकेत भरले, ५० हजार रुपये नारळपाणी विक्रेत्याला दिले आणि २ लाख ५० हजार घरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडे खोटी तक्रार दिल्याचे प्रकरण पतंगे यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.