शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पीएम सन्मान योजनेत जिल्ह्यातील २ लाख ६० हजार शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:32 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ३०४ पात्र शेतकऱ्यांचा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ

नांदेड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ३०४ पात्र शेतकऱ्यांचा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे रविवारी झाला.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथे रविवारी करण्यात आला.याप्रसंगी मान्यवरांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळत असून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सोयीचे होईल व कर्ज काढावे लागणार नाही, असे सांगून शेतकºयांना शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथून होत असलेला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ व मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.गोरखपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकºयांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुरबाडचे गौतम चिंतामण पवार यांनी प्रतिनिधित्व केले असून त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांतील शेतकºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.नांदेड जिल्ह्यात १ हजार ५७५ गावांपैकी आठ ‘अ’ प्रमाणे एकूण खातेदार शेतकरी ७ लाख ९५ हजार ८०० आहेत. या योजनेत परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलित झालेली गावांची संख्या १ हजार ५६८ असून परिपूर्ण असलेले पात्र शेतकरी २ लाख ८९ हजार ३५१ एवढे आहेत. त्यापैकी १ हजार ५१० गावांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. माहिती अपलोड केलेले पात्र शेतकरी कुटुंब २ लाख ६० हजार ३०४ असून टक्केवारी ८९.९६ एवढी आहे, अशी माहिती देण्यात आली.या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची माहिती दिली. यावेळी शेतक-यांचा सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकाची तर कृषिनिष्ठ शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रिय शेतीची माहिती दिली.कार्यक्रमास कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे, तहसीलदार किरण अंबेकर, उज्ज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, एन. टी. पाटे, कृषी अधिकारी श्रीमती पूनम चातरमल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभागचंद बोरा, येमूल, देसाई, संतोष बडवळे, मनोहर, शंकर पवार यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधान