शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पीककर्ज वाटपात बँकांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:50 IST

पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़

ठळक मुद्देचार बँकांना उद्दिष्ट ७१़७९ कोटींचे; वाटप शून्य : आजपर्यंत केवळ सहा टक्केच वाटप

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़दिवसेंदिवस शेतीच्या उत्पन्नात होणारी घट आणि नैसर्गिक आपत्तीने अडचणीत आलेल्या बहुतांश शेतकºयांना पेरणीच्या काळात पैशाची निकड भासते़ परिणामी शेतकºयांना उसनवारी तसेच सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही़ सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही शेतकºयांच्या गळ्याचा फास बनत चालली होती़ ही बाब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीककर्ज सुरू केले़ खरीप आणि रबीच्या पेरणी काळात बँकाना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देणे आणि बँकाच्या माध्यमातून मागेल त्या शेतकºयांना पीककर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे जीव वाचले़ परंतु, मागील दोन वर्षांपासून पीककर्जाकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ यास बँकांचे धोरण आणि अधिकाºयांची उदासीनता कारणीभूत आहे़ दलालामार्फत दहा ते वीस हजार रूपये देणाºया शेतकºयांनाच कर्ज मिळत आहे़ तर सरळ मार्गाने बँकेत जाणाºया बहुतांश शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे़दरम्यान, खरीप पीककर्ज जुलैअखेरपर्यंत वाटप होणे गरजेचे आहे़ मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३९४ शेतकºयांना केवळ १३९़६७ कोटी रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये अनेक बँकांनी एकाही शेतकºयांना कर्ज दिले नाही तर बहुतांश बँकांनी बोटावर मोजण्याइतपत शेतकºयांना पीककर्ज दिले आहे़ जिल्ह्यातील जवळपास २९ बँकांना १६८३ कोटी ४७ लाख रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ १३९़६७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे़---१५ बँकांकडून १०० पेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटपपीककर्जाचे उद्दिष्ट दिलेल्या २९ पैकी बँक आॅफ बडोदा, ओरीएंन्टल बँक आॅफ कॉमर्स, युनियन बँक आॅफ इंडिया आणि एयु स्मॉल फायनान्स बँक या चार बँकांनी एकाही शेतकºयांना पीककर्ज दिले नाही़ तर शंभरपेक्षा कमी शेतकºयांना कर्ज देणाºया १५ बँका आहेत़ यामध्ये अलाहाबाद बँकेला ८ कोटी ६९ लाखाचे उद्दिष्ट असताना केवळ १५ शेतकºयांना २० लाख रूपयांचे वाटप केले आहे़ आंध्र बँक (उद्दिष्ट १६ कोटी ७६ लाख) ४१ शेतकºयांना ४५ लाख,कॅनरा बँकेने (१६.३३ कोटी) ६० शेतकºयांना ६१ लाखांचे वाटप, कार्पोरेशन बँक (८.७५ कोटी) २० शेतकºयांना २५ लाख, आयडीबीआय बँक (५१.५७ कोटी) ४० शेतकºयांना ४४ लाख, इंडियन ओव्हरसिज बँक (६.३० कोटी) २२ शेतकºयांना ३४ लाख, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक (७.७२ कोटी) १४ शेतकºयांना १९ लाख, पंजाब नॅशनल बँक (२३.७८ कोटी) ३२ शेतकºयांना ५४ लाख, सिंडीकेट बँक (५.६७ कोटी) ३० शेतकºयांना ३८ लाख, इको (२.०६ कोटी) ३३ शेतकºयांना ५४ लाख, विजया बँक (७.७२ कोटी) २२ शेतकºयांना ४६ लाख, कोटक महिंद्रा बँक (८.२९ कोटी) ५० शेतकºयांना ५५ लाख, कर्नाटका बँक (१.०८ कोटी) १० शेतकºयांना १५ लाख, करूर वैश्य बँक (१.३१ कोटी) १२ शेतकºयांना १० लाख, डीसीबी बँक (१.२५ कोटी) ९७ शेतकºयांना २ कोटी ४५ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.---बँकनिहाय असे झाले पीककर्जाचे वाटपत्याचबरोबर बँक आॅफ इंडियाने (७७.३६ कोटी) १३२ शेतकºयांना १ कोटी ३३ लाख, बँक आॅफ महाराष्टÑ (८६.६१ कोटी) ७०० शेतकºयांना ५ कोटी दोन लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया (३१.९८ कोटी) १६३ शेतकºयांना १ कोटी २४ लाख, देना बँक (१०२.६५ कोटी) १९६ शेतकºयांना २ कोटी ५३ लाख, एसबीआय (६९०.२० कोटी) ४ हजार ११७ शेतकºयांना ३४ कोटी ३० लाख, अ‍ॅक्सिस बँक (२८.८६ कोटी) ११९ शेतकºयांना ८ कोटी ७७ लाख, एचडीएफसी बँक (२३.१४ कोटी) ३९८ शेतकºयांना १० कोटी ९० लाख, आयसीआयसीआय बँक (१३.६० कोटी) २०८ शेतकºयांना २ कोटी ६७ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँक (२३७.१६ कोटी) ४ हजार ५०१ शेतकºयांना ३२ कोटी ७२ लाख तर क्रॉप बँक व मध्यवर्ती बँकेच्या वतीने (१५२.८२ कोटी) १४ हजार ३६२ शेतकºयांना ३२ कोटी ५४ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरी