शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राजकारणात गुरु मानायची पद्धत आता संपुष्टात-गिरीष गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:41 IST

संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. गिरीष गांधी यांनी केले.

ठळक मुद्देसंगीत शंकर दरबार महामहोपाध्याय कमलाकर परळीकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नांदेड : संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. गिरीष गांधी यांनी केले.डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत शंकर दरबारचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी पं. मुकुल शिवपूत्र यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण होते. यावेळी महामहोपाध्याय डॉ. कमलाकरराव परळीकर, कुलगुरु डॉ. उद्धवराव भोसले, माजीमंत्री वसंतराव पुरके, भाई जगताप, पुष्पाताई पाटील, किशोरअप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.याच कार्यक्रमात महामहोपाध्याय डॉ. कमलाकरराव परळीकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या सोहळ्यात बोलताना डॉ. गांधी यांनी आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्टला विकासाचे राजकारण काय असते, हे दाखवून दिल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री असताना खुद्द पंतप्रधानांचे आदेश काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी कसे विसंगत आहेत, हे दर्शविण्यासाठी शंकरराव चव्हाण हे थेट पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यापर्यंत पोहोचले होते. पंडित नेहरु हे गांधींना आपले गुरु मानत तर शंकरराव चव्हाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ हे आपले गुरु असल्याचे सातत्याने सांगितले. पण आज राजकारणात गुरु मानण्याची पद्धत संपुष्टात आल्याचे गांधी म्हणाले. संगीत शंकर दरबारबद्दल बोलताना डॉ. गांधी यांनी शंकररावांची रसिकता या महोत्सवातून पुढे जोपासली जात असल्याचे ते म्हणाले.जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महामहोपाध्याय कमलाकरराव परळीकर यांनी या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याचे मनोगतात सांगितले. याच कार्यक्रमात धनंजय जोशी, अभिजीत अपस्तंभ, हरिदास उमाटे यांचाही गौरव करण्यात आला.एस. आकाश (बासरी), यज्ञेश रायकर (व्हायोलीन) व ईशान घोष (तबला) यांनी जुगलबंदीतून विविध राग सादर केले. संगीत शंकर दरबारमध्ये मंगळवारी त्रिभुक्ती ही जुगलबंदी रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेली. तर पं, मुकुल शिवपूत्र यांनीही शास्त्रीय गायन सादर केले. प्रारंभी त्यांनी राग ‘गौरी बसंत’सह अनेक राग सादर केले.कार्यक्रमास महापौर शीलाताई भवरे, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, नगरसेवक अमितसिंह तेहरा, दुष्यंत सोनाळे, संजय जोशी आदींची उपस्थिती होती.नांदेडकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी-चव्हाणसंगीत शंकर दरबारला नांदेडकरांनी गेल्या १५ वर्षापासून दिलेली दाद वाखाणण्याजोगी असल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. शंकरराव चव्हाण यांना प्रशासकीय कामात जसा रस होता तसाच सांस्कृतिक क्षेत्रातही विशेषत: शास्त्रीय संगीतात त्यांची आवड असल्याचे सांगितले. नांदेडकरांना या संगीत शंकर दरबार महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी मिळत असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात देशातील नामवंत कलावंतांनी आपली कला सादर केली आहे. यापुढेही अनेक दिग्गज या मंचावर उपस्थित राहतील. नांदेडचे कलावंत आज देशपातळीवर यश मिळवित आहेत. ही बाबही उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडartकलाcultureसांस्कृतिकmusicसंगीतAshok Chavanअशोक चव्हाण