शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 22:00 IST

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: 'पालकमंत्रिपदावरुन अजिबात नाराज नाही. बीड माझाच आहे, आता जालन्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात आनंद आहे.'

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस झाले, तरीदेखील भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अद्याप देशमुख कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता या प्रश्नाचे स्वतः पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे. 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनीच मला न भेटण्याची विनंती केली,' अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. 

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मीडियाशी संवाद साधताना संतोष देशमुख प्रकरणासह पालकमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनीच मला विनंती केली की, परिस्थिती चांगली आहे, तुम्ही येऊ नका. त्यांची परवानगी घेऊन जाईल, असे मी आधीच जाहीर केले आहे.'

'माझ्या जाण्यापेक्षा, माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाऊव संवेदना व्यक्त करणे, हा माझा वैयक्तिक विषय, त्याची जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही. देशमुख कुटुंबीयांनाही माहिती आहे, माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. कोणी कोणाला मारले त्याविषयी काय माझ्या मनात काडीहीची सहानुभूती नसणार. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कशासाठी? असेही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.

बीडचे पालकत्व मिळाले असते तर...पालकमंत्री पदाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी कुठलीही चॉईस देण्याचे कारण नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी एक टर्म मंत्री राहिले, तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते. आता जे पद दिले, ते मी आनंदाने स्वीकारले. मला पत्रकाराने विचारले की, तुम्हाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही. तेव्हा मी म्हणाले, बीडचे पालकमंत्रिपद दिल असते, तर आनंदच झाला असता. मात्र, आता जालन्याचे पालकत्व मिळाले आहे, त्याचाही आनंद आहे. मी अजिबात नाराज नाही. जालन्यात जल्लोष चालू आहे, लोक माझे स्वागत करत आहेत. जालण्यासाठी चांगले करण्याची संधी मला मिळाली आहे.'

मुंडे बहीण-भावाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही, यामागे षडयंत्र वाटते का? असे विचारला असता पंकजा म्हणाल्या, 'मी असे काही मानत नाही. एकूणच पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावे, असे मी फार पूर्वी म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा, यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारले, तर मी स्वागतच करणार, असे म्हटले होते. रेणुका मातेच्या दारात आहे. मला अजिबात वाटले नाही की, हा जिल्हा की तो जिल्हा. बीड माझाच आहे, बीडसाठी मी काम करणारच आहे. आतापर्यंत जो पक्षाने आदेश दिला, तो मान्य केला. प्रेम करणारे लोक जालन्यातदेखील आहेत. मी अजिबात अजिबात नाही, अशा बातम्या लावणं बंद करा,' असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडNandedनांदेड