शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

विष्णूपुरीत मे अखेरपर्यंतचाच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:48 IST

महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे.

नांदेड : महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. त्याचवेळी दोन पथकांकडून गस्तही सुरू असल्याने प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावातून होत असलेला अवैध पाणीउपसा थांबला आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटल्याने दक्षिण नांदेडातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला. विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेल्या अवैध पाणी उपशावर नियंत्रण न मिळवल्याने हा पाणीप्रश्न आणखी गंभीर झाला असता. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तातडीने बैठक घेत अवैध उपसा रोखण्यासाठी ३ पथके तैनात करण्याचे तसेच प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानंतर महावितरणने एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केला. परिणामी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा काही प्रमाणात थांबला आहे. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने गस्त घातली जात आहे. त्यामुळे पूर्वी प्रतिदिन ०.३२ दलघमी होत असलेला पाणी उपसा आता ०.२६ दलघमीवर आला आहे. तापमानातही मोठी वाढ झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळेही पाणीपातळी खालावत आहे. प्रकल्पात आजघडीला केवळ ५.७२ दलघमी जलसाठा उरला आहे. या जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. शहराला इसापूर प्रकल्पातूनही पर्यायी पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. आतापर्यंत इसापूर प्रकल्पातून चार पाणीपाळ्या घेण्यात आल्या आहेत. पाचवी पाणीपाळी निश्चित आहे. पाऊस लांबला तर इसापूरची आणखी एक पाणीपाळी घ्यावी लागणार आहे.आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास ७ किलोमीटर क्षेत्रात पाणी आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळपास आठ ते दहा गावे आहेत. डाव्या बाजूला पाच आणि उजव्या बाजूच्या सहा गावांमध्ये जवळपास २५० हून अधिक अनधिकृत वीजपंपाद्वारे पाणीउपसा केला जात होता. एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केल्याने उपसा आता थांबला आहे. त्याचवेळी शेतकरी या ना त्या मार्गाने पाणी उपसण्यास प्रयत्न करीत आहेतच. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन पथके गस्त घालत आहेत. अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका पथकात ७ कर्मचारी आहेत. त्यात पाटबंधारे विभागाचे २, महापालिकेचे २, तहसील, महावितरण आणि पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाºयाचा समावेश आहे.वेळीच कारवाई झाली असती तऱ़़विष्णूृपुरीतून अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी २ आॅक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत निर्देश दिले होते. १६ ते ३० नोव्हेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत प्रकल्प परिसरातील सर्व बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते.मात्र महावितरणने २५ एप्रिलपर्यंत वीजपुरवठा बंद केलाच नव्हता. परिणामी प्रकल्पातून पाणीउपसा सुरुच राहिला. त्यामुळे दक्षिण नांदेडवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरु आहेत़ पावसाळा लांबल्यास प्रश्न उद्भवणार आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई