शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत मे अखेरपर्यंतचाच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:48 IST

महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे.

नांदेड : महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. त्याचवेळी दोन पथकांकडून गस्तही सुरू असल्याने प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावातून होत असलेला अवैध पाणीउपसा थांबला आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटल्याने दक्षिण नांदेडातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला. विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेल्या अवैध पाणी उपशावर नियंत्रण न मिळवल्याने हा पाणीप्रश्न आणखी गंभीर झाला असता. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तातडीने बैठक घेत अवैध उपसा रोखण्यासाठी ३ पथके तैनात करण्याचे तसेच प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फीडरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानंतर महावितरणने एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केला. परिणामी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा काही प्रमाणात थांबला आहे. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने गस्त घातली जात आहे. त्यामुळे पूर्वी प्रतिदिन ०.३२ दलघमी होत असलेला पाणी उपसा आता ०.२६ दलघमीवर आला आहे. तापमानातही मोठी वाढ झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळेही पाणीपातळी खालावत आहे. प्रकल्पात आजघडीला केवळ ५.७२ दलघमी जलसाठा उरला आहे. या जलसाठ्यातून मे अखेरपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. शहराला इसापूर प्रकल्पातूनही पर्यायी पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जात आहे. आतापर्यंत इसापूर प्रकल्पातून चार पाणीपाळ्या घेण्यात आल्या आहेत. पाचवी पाणीपाळी निश्चित आहे. पाऊस लांबला तर इसापूरची आणखी एक पाणीपाळी घ्यावी लागणार आहे.आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास ७ किलोमीटर क्षेत्रात पाणी आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळपास आठ ते दहा गावे आहेत. डाव्या बाजूला पाच आणि उजव्या बाजूच्या सहा गावांमध्ये जवळपास २५० हून अधिक अनधिकृत वीजपंपाद्वारे पाणीउपसा केला जात होता. एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा बंद केल्याने उपसा आता थांबला आहे. त्याचवेळी शेतकरी या ना त्या मार्गाने पाणी उपसण्यास प्रयत्न करीत आहेतच. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन पथके गस्त घालत आहेत. अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका पथकात ७ कर्मचारी आहेत. त्यात पाटबंधारे विभागाचे २, महापालिकेचे २, तहसील, महावितरण आणि पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाºयाचा समावेश आहे.वेळीच कारवाई झाली असती तऱ़़विष्णूृपुरीतून अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी २ आॅक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत निर्देश दिले होते. १६ ते ३० नोव्हेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत प्रकल्प परिसरातील सर्व बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते.मात्र महावितरणने २५ एप्रिलपर्यंत वीजपुरवठा बंद केलाच नव्हता. परिणामी प्रकल्पातून पाणीउपसा सुरुच राहिला. त्यामुळे दक्षिण नांदेडवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरु आहेत़ पावसाळा लांबल्यास प्रश्न उद्भवणार आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई