शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नांदेडात सुरक्षा उपाययोजनेत स्कूल बसेस नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 20:33 IST

: जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़

ठळक मुद्दे ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़

नांदेड : जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ यातील ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अधिकाऱ्यांनी यावेळी चालकांना चांगलेच धारेवर धरले़ 

नांदेड शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची संख्या ४०० आहे़ तर अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व इतर छोट्या वाहनांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे़ अनेकवेळा या बसेसचे चालक प्रशिक्षित नसतात़ बसची नियमित तपासणी न झाल्यामुळे मध्येच त्या बंद पडणे, किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने रविवार व सुटीच्या दिवशी स्कूल बसची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे़ 

दर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी किमान १५० स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे़ आज चैतन्यनगर परिसरात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ त्यात वाहनाचा चेसिस क्रमांक, परवाना, कागदपत्रे, वाहनात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, चालकाचे वर्तन आदींची तपासणी करण्यात आली़ त्यात अनेक वाहनांमध्ये अग्निशमनची कुठलीच यंत्रणा आढळली नाही़ त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही ठेवण्यात आली नव्हती़ याबाबत प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी स्कूल बसचालकांना सूचना दिल्या़ त्याचबरोबर अचानकपणे स्कूल बसची तपासणी करुन कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़ दरम्यान, या वाहन तपासणीतून रिक्षातून होणारी विनापरवाना वाहतूक मात्र सुटली आहे़ 

रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ‘फ्रंट सिट’ वाहतूकशहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचा परवाना नसतानाही अनेक रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते़ त्यात विद्यार्थ्यांचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे आतमध्ये असते़ त्याचबरोबर फ्रंट सिटवर वाहनचालकांच्या दोन्ही बाजूने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसविले जाते़ दुसरीकडे ५० आसनक्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो़ या बसवरील वाहनचालक हे किती प्रशिक्षित आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे़ 

पालकांची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाचीपोलीस, आरटीओ, शाळा व्यवस्थापन याबरोबरच पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे़ आपल्या पाल्यांना रिक्षात बसविल्यानंतर तो कितपत सुरक्षित आहे? याकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो़ 

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थी