शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडला १२५ कोटींचा दुष्काळनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:35 IST

खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळ निधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील मदत देगलूर, मुखेड, उमरी तालुक्यांना २५ कोटी

नांदेड : खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळनिधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.राज्यात खरीप- २०१८ मधील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे १३६ कोटी १९ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यास १२५ कोटी ७६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ५१ कोटी ५१ लाख रुपये चालू आर्थिक वर्षात वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मान्यता झालेला ५१ कोटी ५१ लाखांचा प्रथम हप्त्यातील २५ कोटी ७५ लाख ५६ हजार ४८० रुपये दुष्काळ बाधित शेतकºयांना वितरित करण्यात येणार आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वरील निर्णयाप्रमाणे देगलूर तालुक्यासाठी पहिल्या हप्त्यात ८ कोटी ७१ लाख ६० हजार १६९, मुखेड १२ कोटी १५ लाख ४० हजार ७५५ रुपये आणि उमरी तालुक्यासाठी पहिल्या हप्त्यात ४ कोटी ८८ लाख ५५ हजार ५४६ रुपये ५ फेब्रुवारी रोजी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जिल्ह्यात देगलूर, मुखेड, उमरीसह अन्य १४ महसूल मंडळातही राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. या दुष्काळी भागातील बाधित शेतक-यांना अनुदान उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यातील रक्कमही प्राप्त झाली आहे.खरीप हंगामात या तालुक्यांतील शेतक-यांना फटका बसलाच. पण सध्याही पाणीटंचाईचा मोठा प्रश्न या भागात भेडसावत आहे. देगलूर तालुक्यात २०१८ मध्ये ४० टक्के, मुखेड तालुक्यात ५८ टक्के आणि उमरी तालुक्यात ८२ टक्के पाऊस झाला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने या तिन्ही तालुक्यांतील खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून निघून गेला होता. दुसरीकडे परतीचा पाऊसही जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागात नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच उद्भवला आहे. पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या २५ कोटींच्या दुष्काळनिधीमुळे या भागातील शेतक-यांना मदतीचा हात मिळणार आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळfundsनिधीWaterपाणी