शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नांदेडला १२५ कोटींचा दुष्काळनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:35 IST

खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळ निधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील मदत देगलूर, मुखेड, उमरी तालुक्यांना २५ कोटी

नांदेड : खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळनिधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.राज्यात खरीप- २०१८ मधील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे १३६ कोटी १९ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यास १२५ कोटी ७६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ५१ कोटी ५१ लाख रुपये चालू आर्थिक वर्षात वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मान्यता झालेला ५१ कोटी ५१ लाखांचा प्रथम हप्त्यातील २५ कोटी ७५ लाख ५६ हजार ४८० रुपये दुष्काळ बाधित शेतकºयांना वितरित करण्यात येणार आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वरील निर्णयाप्रमाणे देगलूर तालुक्यासाठी पहिल्या हप्त्यात ८ कोटी ७१ लाख ६० हजार १६९, मुखेड १२ कोटी १५ लाख ४० हजार ७५५ रुपये आणि उमरी तालुक्यासाठी पहिल्या हप्त्यात ४ कोटी ८८ लाख ५५ हजार ५४६ रुपये ५ फेब्रुवारी रोजी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जिल्ह्यात देगलूर, मुखेड, उमरीसह अन्य १४ महसूल मंडळातही राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. या दुष्काळी भागातील बाधित शेतक-यांना अनुदान उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यातील रक्कमही प्राप्त झाली आहे.खरीप हंगामात या तालुक्यांतील शेतक-यांना फटका बसलाच. पण सध्याही पाणीटंचाईचा मोठा प्रश्न या भागात भेडसावत आहे. देगलूर तालुक्यात २०१८ मध्ये ४० टक्के, मुखेड तालुक्यात ५८ टक्के आणि उमरी तालुक्यात ८२ टक्के पाऊस झाला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने या तिन्ही तालुक्यांतील खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून निघून गेला होता. दुसरीकडे परतीचा पाऊसही जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागात नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच उद्भवला आहे. पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या २५ कोटींच्या दुष्काळनिधीमुळे या भागातील शेतक-यांना मदतीचा हात मिळणार आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळfundsनिधीWaterपाणी