शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:28 AM

फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : केळीच्या बागा झाल्या आडव्या, हळदीचा रंगही पडला फिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार,रविवारी नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले़ वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांत पाऊस झाला़ नांदेड शहर व परिसरात तासभर झालेल्या पावसाने शहरातील नाल्या ओहरफ्लो होवून सर्वत्र रस्त्यांनी पाणीच पाणी झाले होते़ तर होर्डिंग्ज आणि दुकानांसमोरील बॅनर वा-याने रस्त्यावर येवून पडले होते़ तर ग्रामीण भागात आंबा, केळी, चिकू, ऊस आदी पिकांसह अनेक ठिकाणच्या शेतातील झोपड्या वादळी वाºयाने जमीनदोस्त केल्या़ घरावरील पत्रे उडूनही नुकसान झाल्याच्या घटना नांदेड तालुक्यातील तळणी, धानोरा परिसरात घडल्या़ वाºयाचा जोर प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या पडून महावितरणचे मोठे नुकसान झाले़इसापूर धरणाचे पाणी न मिळाल्याने अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांनी आपल्या केळीच्या बागा तोडून काढल्या होत्या़ त्यातच काही शेतकºयांनी उपलब्ध पाण्यामध्ये ठिबक तसेच जिवाचे रान करून आपल्या केळी बागा जगविल्या आहेत़ केळीचे घड नुकतेच भरत असताना वादळी वाºयाने कहर केला़ यात बहुतांश ठिकाणच्या बागांना फटका बसला असून उभ्या केळी आडव्या झाल्या आहेत़ तसेच हळद वाळून ती ढोल करायला (पॉलिश) आली असता अवकाळीने गाठले़ हळद भिजल्याने कोट्यवधी रूपयांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ साडेआठ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारा भाव हळद भिजल्याने निम्मादेखील मिळणार नाही़नांदेड तालुक्यातील राहाटी, तळणी, धानोरा आदी परिसरातील आंब्यासह संत्रा, मोसंबी, केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे़ वाºयाच्या जोराने उभा ऊसदेखील आडवा झाला आहे़ तालुक्यात अंदाजे २०० हेक्टर बागायती आणि ५० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली़ मंगळवारपासून प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरूवात होईल़ यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल, असेही अंबेकर यांनी सांगितले़ पाऊस अन् गारांमुळे पार्डी परिसरातील निमगाव देळूब, कारवाडी, चोरंबा, शेणी भागातील केळी, ज्वारी, टरबूज, हळद, आंब्यासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली़ झाडे उन्मळून पडली़ निमगाव येथे केळीचे नुकसान झाले असून हातात आलेले केळीची बाग गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़कर्नाटकला जाणारी डाळही भिजलीमाहूर तालुक्यातील वाई बाजारसह परिसरात वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला़ यामध्ये वाई परिसरातील वादळी वाºयासह पावसाने परिसरातील बागायतीचे पिकांचे नुकसान झाले़ तसेच जय योगेश्वर अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (दालमिल)मधील हजारो क्विंटल तूरडाळ भिजली़दालमिलचे टिनशेड जमिनीच्या दिशेने झुकल्याने शेडमध्ये असलेली १२६०० पोती तूरडाळ पावसाने भिजून खराब झाली़ ही डाळ कर्नाटक सरकारला पुरवठा करायची होती. सदर पोत्यामध्ये १ किलो वजनी असलेले २५ पॉकीट होते़ तसेच या शेडच्या परिसरात ३९० किलो मोकळी तूरडाळ व ३० क्विंटल हरभºयाचेही नुकसान झाले़ यात मोठे नुकसान झाल्याचे इंडस्ट्रीजचे मालक अतीश गेंटलवार यांनी सांगितले़महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक व्ही़एमग़ड्डमवार, अव्वल कारकून एस़पी़जुकंटवार, संतोष पवार, तलाठी काळे यांनी पंचनामा केला़फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीत २०० कोटींचे अनुदान वाटपफेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीने लिंबगाव परिसरातील फळबागांसह उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते़ दरम्यान, शासनाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांतच नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत दिली़ पिकानुसार शेतकºयांना अनुदान देण्यात आले़ नांदेड तालुक्यात जवळपास २०० कोटी रूपयांचे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले़ अवकाळीने वाई बाजार येथील अ‍ॅग्रो इंडस्ट्रीचे नुकसान झाले आहे़नांदेड उत्तरमध्ये नुकसानीची आ. डी. पी. सावंत यांनी पाहणी करून शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली़ नाळेश्वर, राहाटी व ढोकी गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ आ़सावंत यांनी भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला़ यावेळी सभापती सुखदेव जाधव, साहेबराव धनगे, दीपक पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, रंगनाथ वाघ, बबन वाघमारे, अतुल वाघ आदी उपस्थित होते़

टॅग्स :RainपाऊसHailstormगारपीटfruitsफळे