शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यासमोर मातीसह पीक वाहून गेले; हताश शेतकऱ्याचा पुरातच जीवन संपविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:27 IST

कुटुंब कशावर जगणार?' अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचला

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड): कंधार तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली अनेक पिके मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, शनिवारी तालुक्यातील भोजूच्यावाडी येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वेळीच त्याला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

कंधार तालुक्यात जुलै महिन्यापासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री पासून सारखा पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येथे नाल्या, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या भागात, शनिवारी तालुक्यातील भोजूचीवाडी गावातून एक घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध शेतकऱ्याने डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

शेतकऱ्याची पुराकडे धावचुडाजी कागणे (५५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. कागणे यांच्या शेतातील २६ रोजी शुक्रवारी रात्रीपासून चालू असलेल्या पावसामुळे मातीसह पिके वाहून गेली आहेत. या जमिनीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब जगते. परंतु पाऊस आणि पुरामुळे त्यांचे शेत पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि उभे पीक नष्ट झाले. नुकसानीचे हे दृश्य पाहून त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते जवळून वाहणाऱ्या नदीच्या दिशेने धावले. नदीत उडी मारून आयुष्य संपवण्याचा त्यांचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने गावातील काही तरुणांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. 

शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडदया घटनेमुळे मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती समोर आणली आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. हीच परिस्थिती पूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे. जिथे शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात वाहून गेल्याचे पाहून हवालदिल झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Desperate farmer attempts suicide after crop loss in Nanded flood.

Web Summary : A 55-year-old farmer in Kandhar, Nanded, attempted suicide after heavy rains and flooding destroyed his crops. Villagers rescued him as he ran towards the river, overwhelmed by the devastation of his livelihood.
टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडfloodपूरFarmerशेतकरी