शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

बहुतांश रेल्वेगाड्या आता प्लॅटफार्म चारवरून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:55 PM

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़  यामध्ये एकूण सहा रेल्वेगाड्यांचा समावेश आहे़  

नांदेड येथून मुंबईकडे धावणार्‍या गाड्या प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवरून सोडण्यात येत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्थानिक लोकप्रतिनिधी, रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता़ तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणार्‍या प्रवाशांना वजिराबाद चौरस्ता, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करत स्थानक गाठावे लागते़ तसेच ऐन स्थानकासमोरून एसटी महामंडळाच्या बसेसदेखील धावत असल्याने येथील परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी झालेली असते़ त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची गाडी सुटल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत़  तर हीच अवस्था वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांचीदेखील होती़ त्यामुळे नांदेडातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वे   प्लॅटफॉर्म चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत केली होती़  

लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे प्रशासनाने ७ मार्चपासून काही गाड्यांचे प्लॅटफार्म बदलण्याचा निर्णय घेतला आहे़ यात सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे़ सदर गाड्या महत्त्वपूर्ण रेल्वे म्हणून ओळखल्या जातात़ यामध्ये सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड-तिरुपती एक्स्प्रेस, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, पूर्णा -पाटना एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे़  सदर गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून धावणार आहेत़  गोकुळनगर परिसरात वाहनांची गर्दी कमी असल्याने कमी वेळेत स्थानकात पोहोचणे शक्य होईल़ 

चव्हाणांचा पाठपुरावानांदेड स्थानकातील प्लॅटफार्म एकवर येणार्‍या प्रवाशांना वजिराबाद चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो़ वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी सुटते़ त्यामुळे नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे बोर्ड, दमरेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे सातत्याने केली़ दरम्यान, नांदेड विभागाने मंगळवारी वेळापत्रकात केलेल्या बदलामुळे खा़ चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेड