शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भीषण दुष्काळातही चोख व्यवस्थापनाने शेती केली यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:31 PM

यशकथा : चोख व्यवस्थापनाने पॉलीहाऊसमधील जरबेरा, टरबूज, हळद या पिकांतून लाखोचे उत्पन्न.

- युसूफमियाँ नदाफ (नांदेड) 

शेती करण्याची जिद्द व चिकाटीद्वारे पार्डी म. (ता. अर्धापूर, जि़ नांदेड) येथील ज्ञानेश्वर भांगे पाटील या शेतकऱ्याने दुष्काळातही इतरांना प्रेरणादायी अशी शेती कसली आहे. चोख व्यवस्थापनाने पॉलीहाऊसमधील जरबेरा, टरबूज, हळद या पिकांतून त्यांनी लाखो रुपये उत्पन्न मिळविले आहे.

पार्डी येथे ज्ञानेश्वर दिगंबरराव भांगे पाटील यांचे एकत्र कुटुंब आहे. इतर भाऊ विविध व्यवसाय सांभाळतात. मोठा भाऊ गजानन यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर भांगे पाटील हे वडिलोपार्जित चाळीस एकर शेतीचा भार एकट्याच्या खांद्यावर पेलत असून, मातीतून मोती पिकवित आहेत. दुष्काळामुळे शेतीत पाण्याची कमतरता पडते याची जाणीव असल्याने त्यांनी शेतीचे अगदी चोख व्यवस्थापन केले आहे. सर्व शेतीत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात जास्तीचे उत्पन्न कसे घेता येईल, यावर त्यांचा नेहमी भर असतो.

शेतीत तीन विहिरी असून संपूर्ण शेतात त्यांनी पाईपलाईनचे जाळे विणले आहे. माल वाहतूक करण्यासाठी बांधापर्यंत मजबूत कच्चे रस्ते आहेत. शेतीत विविध नवनवीन पिकांचा ते नेहमी प्रयोग करतात. त्यांनी वीस गुंठ्यावर पॉलीहाऊसची उभारणी केली. यात लाल माती आणून गादीवाफे तयार करून जरबेराची लागवड केली. नांदेड व हैदराबादच्या मार्केटमध्ये विक्री करीत जवळपास तीन वर्षांमध्ये पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न काढले होते. 

मागील दोन, तीन वर्षांमध्ये इसापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे केळीची लागवड घटली होती. अशावेळी कमी पाण्यात व कमी वेळेत येणारे पीक म्हणून तीन एकरमध्ये टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात नियोजनबद्ध व्यवस्थापन, जिद्द आणि चिकाटीच्या बळवर तीन एकरमध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न काढले. याबद्दल ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

गतवर्षी सात एकरमध्ये हळदीमध्येही विक्रमी उत्पादन काढून दोनशे क्विंटलच्या वर उत्पन्न काढले आहे. यावर्षीही त्यांनी बारा एकरवर हळद पिकाची लागवड केली आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधनही आहे. या पशुधनापासून त्यांना भरपूर शेणखत मिळते. यामुळे उत्पन्नात भर मोठी भर पडत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत विविध पिकांत चोख व्यवस्थापन, पिकांचे सूक्ष्म निरीक्षण, कीडरोग नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना त्यांनी केले आहे.

पाणी, खते, फवारणी, वातावरणात होणारे बदल याबाबत दक्ष राहिल्यास शेती चांगली पिकेल आणि शेतकरीही टिकेल, असा आत्मविश्वास ज्ञानेश्वर भांगे पाटील हे व्यक्त करतात. त्यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यांमधूनही शेतकरी त्यांच्या शेतावर भेटी देत असतात. एवढेच नव्हेतर, कृषीविभागातील अधिकारीही भेट देऊन पाहणी करतात.उत्तम व्यवस्थापनाद्वारे शेती यशस्वी करून त्यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी