शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 1:22 PM

यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.

ठळक मुद्देपरीक्षार्थींचा गोंधळ, पूर्वसूचना न देताच केला बदल

- भारत दाढेल

नांदेड : विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर पॅटर्न मध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे एमएचटी सीईटी (MHT-CET ) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यामुळे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहे. यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. पीसीएमबी आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठी स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले. एकूण १८० मिनिटांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात दोन भाग असून फिजिक्स , केमिस्ट्री व मॅथ किंवा बायोलॉजी असे दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, हे स्वतंत्र भाग असले तरी तसे सॉफ्टवेअर मात्र मानत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय स्कोअरिंग असेल व त्याने तसा तो पेपर सोडविला तर ९० मिनिटे संपल्यानंतर दुसरा पेपर फिजिक्स, केमिस्ट्रीचा उघडत नाही. त्या विद्यार्थ्यांला या पेपरपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक परीक्षा यंत्रणेने याबाबत प्रवेश पत्रावर किंवा एमएचटी सीईटीच्या अधिसूचनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यापूर्वी सूचना दिल्या जात आहेत. त्याही स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

सीईटी सेलला जर, फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा सोडविणे अपेक्षित असेल तर, दुसरा पेपर लॉक असायला हवा असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतच्या सर्व सूचना निसंदिग्ध असायला हव्या होत्या. विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सीईटी सेलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तरी तेथे कोणीही उपलब्ध नसतात. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दुबार परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होती.

सीईटी सेलने या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बदल हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही चॉईसप्रमाणे पेपर सोडवू शकत नाही. मॅथसाठी कच्चे काम करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मंडळाने कोणता पेपर आधी सोडवावा, हा चॉईस विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.-निकेतन उदगीरे, विद्यार्थी, नांदेड

अचानकपणे बदल करणे चुकीचे आहे. मंडळाच्या तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये, मॅथचा पेपर दुसरा असेल व दोन्ही पेपरचे गुण एकत्रित दिले जात असतील तर, पेपरचा क्रम न सांगता अनिवार्य करण्याचे काय प्रयोजन आहे.- यश लोंढे, विद्यार्थी, नांदेड.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद