शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

यंदा भरपूर आमरस; केशर १२० किलो, तर हापूस आंबा सहाशे रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST

नांदेड : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. ...

नांदेड : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे. परंतु, कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.

यंदा रत्नागिरीचा हापूस आंबा ६०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत निम्म्याच दराला विक्री करण्यात येत आहे. केशर ११० रुपये, पायरी ८०, तर गावरान आंबे हे ७० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता. परंतु, यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्यांचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. नांदेड शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

आवक वाढली, ग्राहक रोडावले

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नागिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबा घेऊन आले आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केला जात आहे. परंतु, ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. दररोज सकाळी गाडा लावल्यानंतर सायंकाळपर्यंत मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.