शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:14 IST

जातीचे राजकारण-भ्रष्टाचार-आरक्षण संपविण्याचे पाप हाच महाविकास आघाडीचा चेहरा: ज्योतिरादित्य शिंदे

मालेगाव ( नांदेड) : विधानसभेची ही निवडणूक एक प्रकारचे युद्ध आहे. या युद्धातील महाविकास आघाडीतील एका पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीचे राजकारण केले, तर दुसरा पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला आहे. तर तिसऱ्या पक्षाने आरक्षण संपण्याचे प्रयत्न केले आहेत. ही महाविकास आघाडी नव्हे, तर महाविनाश आघाडी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना निवडणुकीत पराभूत करून त्यांना जागा दाखवा, असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या सभेला खासदार अशोकराव चव्हाण, बालासाहेब पांडे, विक्रम सिंह, सचिन साठे, अमिता चव्हाण, नरेंद्र चव्हाण, उमेदवार श्रीजया चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव इंगोले, सरपंच मारुती बुट्टे, संतोष पांडागळे, बापूराव गजभारे, केशवराव इंगोले, बळवंत पाटील आदींची उपस्थिती होती.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शिंदे घराण्यानी मराठ्यांचे साम्राज्य वाढवण्यासाठी ऐतिहासिक कार्य केलेले आहे. दिल्लीत मराठ्यांचा भगवा फडकवण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्यांना युद्ध जिंकण्याचा वारसा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही युद्धच आहे. महाविकास आघाडी सरकारने धर्मात व जाती-जातींत भांडणे लावण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकरी, रोजगार, महिलांसाठी चांगल्या योजना राबविल्या आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांना फक्त सत्तेची हाव आहे. सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांची त्यांना काहीच गरज नाही. महायुती सरकारला विश्वासाची विचारधारा आहे. तर आघाडी सरकारला भ्रष्टाचाराचे कलंक आहे. महायुती सरकारने गोरगरिबांची तिजोरी भरण्याचे काम केले. तर आघाडी सरकारने तिजोरी खुली करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले.

चव्हाण आणि शिंदे परिवाराचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. चव्हाण घराण्याची तिसरी पिढी राजकारणात येत आहे. त्यांना आपण साथ देऊन विकासाचा वटवृक्ष उभा करावा. कारण डॉ. शंकराव चव्हाण यांचा परिवार समाजसेवी परिवार आहे, असेही ते म्हणाले.

मालेगावातून शंकरराव चव्हाण यांची राजकीय जडणघडण : अशोकराव चव्हाणशंकरराव चव्हाण यांना राजकीय ताकद मालेगावकरांनी दिली आहे. मालेगावच्या भूमीतूनच ते दिल्लीदरबारी गेले होते. त्यांच्या राजकीय भवितव्याची सुरुवात मालेगाववासीयांनी केली. श्रीजया चव्हाण ही मालेगावची मुलगी आहे. शंकररावांच्या नातीला आपण साथ द्यावी, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणासाठी कोणी राजकारण करू नये. मीही आरक्षणाचा पुरस्काराचा आहे. सदैव सोबत राहणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokar-acभोकरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAshok Chavanअशोक चव्हाण