शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

इसापूर ५५ टक्के भरले; रबीचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:49 IST

नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़गतवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला़ परंतु, इसापूर प्रकल्पक्षेत्र असलेल्या बुलढाणा,वाशिम जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते़ गतवर्षी केवळ १४़१७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता़ अशीच स्थिती मागील चार वर्षांपासून होती़ २०१५-१६ मध्ये इसापूर ३५़१३ टक्के, २०१६-१७ मध्ये ४८़५८ टक्के तर गतवर्षी केवळ १४़१७ टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या जवळपास ८५ हजार हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता़ पाण्याअभावी गतवर्षी बहुतांश शेतकºयांना जिवापाड जपलेली केळी तोडून टाकावी लागली़ तर हजारो हेक्टरवरील ऊस आणि इतर पिकांना मोठा फटका बसला होता़ त्यामुळे या भागातील शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते़मागील चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा इसापूर प्रकल्प क्षेत्र असलेल्या बुलढाणा, वाशिम, हिंगोली तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ परिणामी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण ५५ टक्के भरल्याची नोंद झाली होती़ त्यामुळे आगामी दोन वर्षांतील पिण्यासह जवळपास खरीप आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे़इसापूर धरणावर तीन जिल्ह्यांतील ८५ हजार १९४ हेक्टर सिंचन अवलंबून आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरिपाचे १६ हजार ९३३ हेक्टर, रबीचे ४० हजार ७५ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे ४ हजार ५१५ हेक्टरचा समावेश आहे़ त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील खरीप-४ हजार २८ हेक्टर, रबी - ९५३३ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १ हजार ७४ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील खरिपाचे ४ हजार ५९७ हेक्टर, रबी- १० हजार ८८० हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १२२६ हेक्टर जमीनक्षेत्र अवलंबून आहे़---तीनशेहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलानांदेडसह हिंगोली,यवतमाळ जिल्ह्यांतील जवळपास ३०० गावांची तहाण भागणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, मुदखेड, मुदखेड सीआरपीएफ कॅम्प यासह गरजेनुसार पाणी उपलब्ध करून दिले जाते़ त्याचबरोबर टंचाईच्या काळात नांदेड शहराला डाव्या कालव्याच्या माध्यमातून आसना नदीत पाणी सोडले जाते़ मागील वर्षात दोनवेळा इसापूरचे पाणी आसनामध्ये सोडण्यात आले होते़ त्यामुळे नांदेड उत्तरसह परिसरारातील दहा ते पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला होता़ दरम्यान, नांदेडसह कळमनुरी, ४० गाव माळपठार,८ गावे तिखाडी, भाटेगाव परिसरातील २७ गावे, डाव्या कालव्यावर असणारी इतर ४५ गावे अशा एकूण जवळपास तीनशे गावांना पंपहाऊस आण्रि कालव्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या जाते़

गतवर्षीच्या तुलनेत यंदा इसापूर धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे आगामी रबी हंगामात जवळपास ४ पाणीपाळ्या देण्याबरोबरच उन्हाळ्यातील पाणीपाळ्यांचे नियोजन करता येईल़ येत्या नोव्हेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीमार्फत पाणी वाटप, आरक्षण आदींचे नियोजन केले जाईल़ परंतु, सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा शेतकºयांसह पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर आधारित असलेल्या गावांना पातळीपातळीत होणारी वाढ दिलासादायक आहे़ अशाच पद्धतीने येवा सुरू राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल़- व्ही़ के़ कुरूंदकर, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प-१, नांदेड़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस