शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर ५५ टक्के भरले; रबीचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:49 IST

नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़गतवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला़ परंतु, इसापूर प्रकल्पक्षेत्र असलेल्या बुलढाणा,वाशिम जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते़ गतवर्षी केवळ १४़१७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता़ अशीच स्थिती मागील चार वर्षांपासून होती़ २०१५-१६ मध्ये इसापूर ३५़१३ टक्के, २०१६-१७ मध्ये ४८़५८ टक्के तर गतवर्षी केवळ १४़१७ टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या जवळपास ८५ हजार हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता़ पाण्याअभावी गतवर्षी बहुतांश शेतकºयांना जिवापाड जपलेली केळी तोडून टाकावी लागली़ तर हजारो हेक्टरवरील ऊस आणि इतर पिकांना मोठा फटका बसला होता़ त्यामुळे या भागातील शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते़मागील चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा इसापूर प्रकल्प क्षेत्र असलेल्या बुलढाणा, वाशिम, हिंगोली तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ परिणामी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण ५५ टक्के भरल्याची नोंद झाली होती़ त्यामुळे आगामी दोन वर्षांतील पिण्यासह जवळपास खरीप आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे़इसापूर धरणावर तीन जिल्ह्यांतील ८५ हजार १९४ हेक्टर सिंचन अवलंबून आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरिपाचे १६ हजार ९३३ हेक्टर, रबीचे ४० हजार ७५ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे ४ हजार ५१५ हेक्टरचा समावेश आहे़ त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील खरीप-४ हजार २८ हेक्टर, रबी - ९५३३ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १ हजार ७४ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील खरिपाचे ४ हजार ५९७ हेक्टर, रबी- १० हजार ८८० हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १२२६ हेक्टर जमीनक्षेत्र अवलंबून आहे़---तीनशेहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलानांदेडसह हिंगोली,यवतमाळ जिल्ह्यांतील जवळपास ३०० गावांची तहाण भागणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, मुदखेड, मुदखेड सीआरपीएफ कॅम्प यासह गरजेनुसार पाणी उपलब्ध करून दिले जाते़ त्याचबरोबर टंचाईच्या काळात नांदेड शहराला डाव्या कालव्याच्या माध्यमातून आसना नदीत पाणी सोडले जाते़ मागील वर्षात दोनवेळा इसापूरचे पाणी आसनामध्ये सोडण्यात आले होते़ त्यामुळे नांदेड उत्तरसह परिसरारातील दहा ते पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला होता़ दरम्यान, नांदेडसह कळमनुरी, ४० गाव माळपठार,८ गावे तिखाडी, भाटेगाव परिसरातील २७ गावे, डाव्या कालव्यावर असणारी इतर ४५ गावे अशा एकूण जवळपास तीनशे गावांना पंपहाऊस आण्रि कालव्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या जाते़

गतवर्षीच्या तुलनेत यंदा इसापूर धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे आगामी रबी हंगामात जवळपास ४ पाणीपाळ्या देण्याबरोबरच उन्हाळ्यातील पाणीपाळ्यांचे नियोजन करता येईल़ येत्या नोव्हेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीमार्फत पाणी वाटप, आरक्षण आदींचे नियोजन केले जाईल़ परंतु, सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा शेतकºयांसह पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर आधारित असलेल्या गावांना पातळीपातळीत होणारी वाढ दिलासादायक आहे़ अशाच पद्धतीने येवा सुरू राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल़- व्ही़ के़ कुरूंदकर, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प-१, नांदेड़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस