शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

इसापूर ५५ टक्के भरले; रबीचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:49 IST

नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़गतवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला़ परंतु, इसापूर प्रकल्पक्षेत्र असलेल्या बुलढाणा,वाशिम जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते़ गतवर्षी केवळ १४़१७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता़ अशीच स्थिती मागील चार वर्षांपासून होती़ २०१५-१६ मध्ये इसापूर ३५़१३ टक्के, २०१६-१७ मध्ये ४८़५८ टक्के तर गतवर्षी केवळ १४़१७ टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या जवळपास ८५ हजार हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता़ पाण्याअभावी गतवर्षी बहुतांश शेतकºयांना जिवापाड जपलेली केळी तोडून टाकावी लागली़ तर हजारो हेक्टरवरील ऊस आणि इतर पिकांना मोठा फटका बसला होता़ त्यामुळे या भागातील शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते़मागील चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा इसापूर प्रकल्प क्षेत्र असलेल्या बुलढाणा, वाशिम, हिंगोली तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ परिणामी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण ५५ टक्के भरल्याची नोंद झाली होती़ त्यामुळे आगामी दोन वर्षांतील पिण्यासह जवळपास खरीप आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे़इसापूर धरणावर तीन जिल्ह्यांतील ८५ हजार १९४ हेक्टर सिंचन अवलंबून आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरिपाचे १६ हजार ९३३ हेक्टर, रबीचे ४० हजार ७५ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे ४ हजार ५१५ हेक्टरचा समावेश आहे़ त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील खरीप-४ हजार २८ हेक्टर, रबी - ९५३३ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १ हजार ७४ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील खरिपाचे ४ हजार ५९७ हेक्टर, रबी- १० हजार ८८० हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १२२६ हेक्टर जमीनक्षेत्र अवलंबून आहे़---तीनशेहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलानांदेडसह हिंगोली,यवतमाळ जिल्ह्यांतील जवळपास ३०० गावांची तहाण भागणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, मुदखेड, मुदखेड सीआरपीएफ कॅम्प यासह गरजेनुसार पाणी उपलब्ध करून दिले जाते़ त्याचबरोबर टंचाईच्या काळात नांदेड शहराला डाव्या कालव्याच्या माध्यमातून आसना नदीत पाणी सोडले जाते़ मागील वर्षात दोनवेळा इसापूरचे पाणी आसनामध्ये सोडण्यात आले होते़ त्यामुळे नांदेड उत्तरसह परिसरारातील दहा ते पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला होता़ दरम्यान, नांदेडसह कळमनुरी, ४० गाव माळपठार,८ गावे तिखाडी, भाटेगाव परिसरातील २७ गावे, डाव्या कालव्यावर असणारी इतर ४५ गावे अशा एकूण जवळपास तीनशे गावांना पंपहाऊस आण्रि कालव्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या जाते़

गतवर्षीच्या तुलनेत यंदा इसापूर धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे आगामी रबी हंगामात जवळपास ४ पाणीपाळ्या देण्याबरोबरच उन्हाळ्यातील पाणीपाळ्यांचे नियोजन करता येईल़ येत्या नोव्हेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीमार्फत पाणी वाटप, आरक्षण आदींचे नियोजन केले जाईल़ परंतु, सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा शेतकºयांसह पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर आधारित असलेल्या गावांना पातळीपातळीत होणारी वाढ दिलासादायक आहे़ अशाच पद्धतीने येवा सुरू राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल़- व्ही़ के़ कुरूंदकर, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प-१, नांदेड़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊस