शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:11 IST

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड: नांदेड जिल्ह्यासह हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण शंभर टक्के भरल्याने हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी धरणाचे दोन गेट उघडले असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत तीन जिल्ह्यांतील जवळपास १ लाख १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सिंचन केले जाते. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी इसापूर धरणातील पाणीपाळ्या शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या ठरतात.

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जयपूर बंधा-यातून येणारा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणात येणारे अतिरिक्त पाणी इसापूर धरणाच्या सांडव्याची दोन गेट १० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ६९४ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातील येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या परिसरातील नदीकाठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मंगळवारी धरणक्षेत्रातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचा येवा वाढल्यास धरणाचे गेट आणखी उघडण्यात येतील, असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसDamधरणNandedनांदेडHingoliहिंगोलीWaterपाणी