शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट रोखणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात ...

नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात बालरोगतज्ज्ञ आजघडीला कार्यरत आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याएवढ्या बालरोग तज्ज्ञांच्या भरवशावर तिसरी लाट रोखणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आयएमएच्या शंभरहून अधिक बालरोगतज्ज्ञांची गरज पडल्यास मदत घेता येणार असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता आहे; परंतु आजघडीला जिल्हा रुग्णालयात ३ आणि चार उपजिल्हा रुग्णालयात मिळून आठ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्या तुलनेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मात्र पूर्ण युनिट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञांची कमतरता भासणार नाही; परंतु तिसऱ्या लाटेत अधिक जण बाधित झाल्यास मात्र उपलब्ध बालरोगतज्ज्ञांवर कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आयएमएशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यापूर्वीच्या दोन लाटेत आयएमएच्या सदस्यांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे मुकाबला करण्याचा विश्वास आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे.

कोरोनाची संभाव्य लाट बालकांवर परिणाम करणारी असल्याने त्यासंदर्भाने वैद्यकीय साधनांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे. बालकांसाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, तसेच बालकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधी मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे स्वत: या बालरोग कक्ष उभारणीकडे लक्ष देऊन आहेत. प्रशासनाला ते सूचना देत आहेत. बालकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पालकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील स्थिती वाईट

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तरुणांना अधिक घातक ठरली. त्यात आता तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येते; परंतु नांदेड जिल्ह्यात आजही ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यातही बालरोगतज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना नांदेडलाच यावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही नावालाच आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.