शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

शिधापत्रिकाधारक सदस्यांची आधार व्हेरिफिकेशनसाठी धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:41 AM

तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देस्थलांतरित कुटुंबात संभ्रम, योजनांचा लाभ न मिळण्याची भीती

कंधार : तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे. परंतु त्यांना राज्यात कोठेही यंत्रात आधार व्हेरिफिकेशन करता येते, असे तहसीलमधील संबंधित विभागातून सांगण्यात आले.तालुक्यात ५ प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ४५ हजार ३ अशी आहे. त्याची लोकसंख्या २ लाख २१ हजार ७७९ अशी आहे. त्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक संख्या ३ हजार ३० व लोकसंख्या १५ हजार ३७७ आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचे ३२ हजार १२१ शिधापत्रिका धारक व लोकसंख्या १ लाख ६० हजार ६८६ आहे. ही सगळ्यात जास्त शिधापत्रिका व लोकसंख्या असलेली संख्या आहे.एपीएल शेतकरी शिधापत्रिका ७ हजार ८८२ आहे. याची लोकसंख्या ३७ हजार ५४३ आहे. एनपीएच केशरी ६९१ व लोकसंख्या २ हजार ४९३ आणि एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक संख्या १ हजार २७९ असून लोकसंख्या ५ हजार ६८० आहे. एनपीएचव एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नाही. इतर शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळते.आधार काढताना नावात चुका, जन्मतारखेत चूक असेल तर दुरूस्ती करणे गरजेचे आहे. आॅनलाईनचे काम सुमारे ८० टक्के झाल्याचे समजते. मेंबर आधार व्हेरिफिकेशनचे काम १७६ दुकानात चालू आहे. रेशन दुकानात ई-पॉश मशीन आहेत. तेथे अंगठा लावणे गरजेचे आहे. येथे अंगठा मॅच होत नसेल तर आधार केंद्रात जावे लागेल. आधार व्हेरिफिकेशन केल्याने नावात दुरूस्ती होईल. शिधापत्रिका मिळतील, लाभार्थ्यांना जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास अडचण होणार नाही.१५ वर्षांखालील मुलांचे व वयोवृद्ध व्यक्तीचे आधार व्हेरिफिकेशन करताना अडचण येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासाठी जवळच्या आधार केंद्रात आधार अपडेट करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. सध्या रेशन बंद होणार नाही ; पण भविष्यात मात्र धोका नाकारता येत नाही. तसेच १६ हजार २० जणांचे आधार नोंदविणे शिल्लक आहे. त्यांना आता ईकेवायसीच्या माध्यमातून नोंदणी करता येते. आता या संधीचा फायदा संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार संतोषी देवकुळे यांनी केले आहे.तालुक्यात दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबातील सदस्य पाल्याच्या शिक्षण, विवाह, रोजीरोटीसाठी वीटकाम, बांधकाम, ऊसतोडणीसाठी तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत. गावाकडून आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी अशा सदस्यांना भ्रमणध्वनी केले जात आहेत. लांब असलेल्या सदस्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात कोठेही आधार व्हेरिफिकेशन करता येते.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न