शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

राष्ट्रीयकृत बँकांचा ग्राहकांप्रती दुजाभाव आर्थिक विषमता वाढवणार: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 15:50 IST

फाटके धोतर घालून जाणाऱ्यांना दोन दोन दिवस अधिकारी भेटत नाही तर सुटा-बुटातील ग्राहकास लगेचच खुर्ची दिली जाते.

नांदेड: राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकरी, गोरगरीब ग्राहकांना मिळणारी वागणूक चुकीची आहे. फाटके धोतर घालून जाणाऱ्यांना दोन दोन दिवस अधिकारी भेटत नाही तर सुटा-बुटातील ग्राहकास लगेचच खुर्ची दिली जाते. ही बाब आर्थिक विषमतेची दरी वाढविणारी आहे, अशी खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे सहकारी बँका मजबूत करून ग्रामीण भागातील जनतेला आधार अन् सन्मान देण्याची गरज असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. 

नांदेड येथे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचा उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प.पू.सूर्यकांत देसाई गुरूजी, बाबा बलविंदरसिंघ, गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी पवार यांच्या हस्ते फित कापून बँकेच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर आयोजित सोहळ्यात त्यांनी मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील ६० ते ६२ टक्के लोक शेती करतात. त्यात ८० टक्के शेतीयोग्य असलेल्या जमिनीपैकी ६० टक्के जमिनीला खात्रीशीर पाणी उपलब्ध होत नाही. शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीवरील भार कमी करणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकाने शेती न करता पर्यायी व्यवसाय, उद्योगात पाऊल टाकणे गरजेचे आहे. शेतात उत्पन्न होणाऱ्या हळद, सोयाबीन, ऊस आदी पिकांशी संबंधीत उद्योग उभारण्याची गरज आहे. या उद्योग उभारणीत सहकारी बँकाचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे. त्यातूनच देशाची आर्थिक सुबत्ता वाढेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

स्वतच्या पायावर उभं राहण्याची जिद्द असेल त्यांच्यासाठी नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणात गोदावरीने केलेले काम कौतूकास्पद आहे. ज्याप्रमाणे ऊसाचा वापर केवळ साखर काढण्यापुरता मर्यादीत न ठेवता त्याच्यापासून वीजनिर्मिती, इथेनॉल तसेच तत्सम घटक निर्माण करून अतिरिक्त पैसा कमावण्याचे काम केले जात आहे. देशातील साखर निर्यात करून ४० हजार कोटी रूपये मिळतात. त्यामुळे ऊसाप्रमाणेच सोयाबीन, कपाशी, हळदीवर विविध संशोधन होवून त्यांची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. नांदेडसह हिंगोली, परभणीमध्ये हळदीचे उत्पन्न अधिक असल्याने हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी मान्यता शासनाने दिली आहे. त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांचा पाठपुरावा वाखाण्याजाेगा आहे. त्यातून निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

विकासासाठी एकविचार महत्वाचादेशाच्या विकासात समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नेहमीच विधायक, विकासात्मक कामासाठी एका विचाराने सोबत असतात. अशीच भूमिका नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने घेतली तर निश्चितच देशाचा विकास होवून चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbankबँकNandedनांदेड