शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 18:46 IST

राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार संघात देखील मराठा आंदोलक हजारो उमेदवार देणार आहेत 

 - गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : मागील कांही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकाराने चर्चेत येत असून  मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे. त्यातच शासनाने मराठा यौध्दा मनोज जरांगे पाटील यांची एस.आय. टी. मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालविली आहे. याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यभरातून मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्यातील मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गामधून आरक्षण आणि ' सगेसोयरे ' च्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. त्यांच्या या लढ्याला मराठा समाजाची देखील साथ मिळत आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाजा कडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. मात्र शासनाकडून कुठलीच दखल घेतली जातं नाही. उलट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एस.आय.टी. लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये शासना विरोधात नाराजी पसरली आहे. तेंव्हा रस्त्यावरील आंदोलना सोबतच गमिनीकावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. 

प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे एकूण नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणूकीच्या रिंगण्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दि.२९ फेब्रुवारी गुरूवार रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाची बैठक देखील पार पडली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शेकडोंच्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणुक सर्वच पक्षासाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

निवडणूक विभागाची होणार दमछाकमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार असून एका कंट्रोल युनिटवर २४ बॅलेट युनिट लावता येतात. १ बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांच्या चिन्हांची बटणे असतात. एकूण २४ युनिटवर ३८४ उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश व 'ईव्हीएम' ची क्षमता असते. जर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो. त्यामुळे शासनाला अडचणीत आणण्यासाठी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करून मराठा समाज गनिमी कावा करणार आहे. जर असे झाले तर मात्र निवडणुक विभागाची मोठी दमछाक होणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड