शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने चीनसारखा कायदा करावा : योगगुरू रामदेवबाबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST

भारतातही आता कायद्याची गरज आहे.

ठळक मुद्देचीनसारखा भारत सरकारने कायदा करावाराममंदिर हा लोकांच्या आस्थेचा विषय

नांदेड :  देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजघडीला १२५ कोटी आधारकार्ड तयार झाले आहेत. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर देशाचा विकास थांबेल. चीनने लोकसंख्येबाबत कठोर कायदा केल्यानेच लोकसंख्या नियंत्रणात आली. भारतातही आता कायद्याची गरज आहे. असे प्रतिपादन  योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी नांदेडमध्ये होणाºया राज्यस्तरीय योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.  ते म्हणाले, जन्म घालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाल्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. जन्म देवून मुले सोडून देणाऱ्यावरही आता कारवाईची गरज आहे.  काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भातील विषय आपण अद्याप सोडला नसल्याचेही ते म्हणाले. एक देश, एक चुनाव या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. योगासंदर्भात बोलताना योग हा सर्व व्याधी दूर करण्याचा उपाय असल्याचे सांगितले. योगामुळे ९९ टक्के आजार दूर होतात. पतंजलीच्या माध्यमातून योगदिनानिमित्त उद्या देशात तीन ते चार कोटी लोक योग करतील तर जगात १५ ते २० कोटी लोक जागतिक योग दिनानिमित्त योगा करतील, असेही ते म्हणाले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख आदींची उपस्थिती होती.

योगामुळे विरोधकांचेही मनोबल वाढेलदेशातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधक कमी झाले आहेत. योग हा सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री योगा करीत आहेत. विरोधकांनीही योगा केल्यास त्यांचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आगामी काळात त्यांची संख्याही वाढेल, असा टोला रामदेवबाबा यांनी लगावला.  योग हा कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच आपले स्वागत सना उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिरासाठी कायदा करावा

राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरीही तो लोकांचा व देशाच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर प्रश्नासंदर्भात नेमलेल्या मध्यस्थांकडून हा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारनेच कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राममंदिर उभारतील, असे रामदेवबाबा म्हणाले.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडYogaयोग