शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने चीनसारखा कायदा करावा : योगगुरू रामदेवबाबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST

भारतातही आता कायद्याची गरज आहे.

ठळक मुद्देचीनसारखा भारत सरकारने कायदा करावाराममंदिर हा लोकांच्या आस्थेचा विषय

नांदेड :  देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजघडीला १२५ कोटी आधारकार्ड तयार झाले आहेत. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर देशाचा विकास थांबेल. चीनने लोकसंख्येबाबत कठोर कायदा केल्यानेच लोकसंख्या नियंत्रणात आली. भारतातही आता कायद्याची गरज आहे. असे प्रतिपादन  योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी नांदेडमध्ये होणाºया राज्यस्तरीय योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.  ते म्हणाले, जन्म घालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाल्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. जन्म देवून मुले सोडून देणाऱ्यावरही आता कारवाईची गरज आहे.  काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भातील विषय आपण अद्याप सोडला नसल्याचेही ते म्हणाले. एक देश, एक चुनाव या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. योगासंदर्भात बोलताना योग हा सर्व व्याधी दूर करण्याचा उपाय असल्याचे सांगितले. योगामुळे ९९ टक्के आजार दूर होतात. पतंजलीच्या माध्यमातून योगदिनानिमित्त उद्या देशात तीन ते चार कोटी लोक योग करतील तर जगात १५ ते २० कोटी लोक जागतिक योग दिनानिमित्त योगा करतील, असेही ते म्हणाले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख आदींची उपस्थिती होती.

योगामुळे विरोधकांचेही मनोबल वाढेलदेशातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधक कमी झाले आहेत. योग हा सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री योगा करीत आहेत. विरोधकांनीही योगा केल्यास त्यांचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आगामी काळात त्यांची संख्याही वाढेल, असा टोला रामदेवबाबा यांनी लगावला.  योग हा कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच आपले स्वागत सना उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिरासाठी कायदा करावा

राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरीही तो लोकांचा व देशाच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर प्रश्नासंदर्भात नेमलेल्या मध्यस्थांकडून हा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारनेच कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राममंदिर उभारतील, असे रामदेवबाबा म्हणाले.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडYogaयोग