शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने चीनसारखा कायदा करावा : योगगुरू रामदेवबाबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST

भारतातही आता कायद्याची गरज आहे.

ठळक मुद्देचीनसारखा भारत सरकारने कायदा करावाराममंदिर हा लोकांच्या आस्थेचा विषय

नांदेड :  देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजघडीला १२५ कोटी आधारकार्ड तयार झाले आहेत. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर देशाचा विकास थांबेल. चीनने लोकसंख्येबाबत कठोर कायदा केल्यानेच लोकसंख्या नियंत्रणात आली. भारतातही आता कायद्याची गरज आहे. असे प्रतिपादन  योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी नांदेडमध्ये होणाºया राज्यस्तरीय योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.  ते म्हणाले, जन्म घालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाल्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. जन्म देवून मुले सोडून देणाऱ्यावरही आता कारवाईची गरज आहे.  काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भातील विषय आपण अद्याप सोडला नसल्याचेही ते म्हणाले. एक देश, एक चुनाव या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. योगासंदर्भात बोलताना योग हा सर्व व्याधी दूर करण्याचा उपाय असल्याचे सांगितले. योगामुळे ९९ टक्के आजार दूर होतात. पतंजलीच्या माध्यमातून योगदिनानिमित्त उद्या देशात तीन ते चार कोटी लोक योग करतील तर जगात १५ ते २० कोटी लोक जागतिक योग दिनानिमित्त योगा करतील, असेही ते म्हणाले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख आदींची उपस्थिती होती.

योगामुळे विरोधकांचेही मनोबल वाढेलदेशातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधक कमी झाले आहेत. योग हा सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री योगा करीत आहेत. विरोधकांनीही योगा केल्यास त्यांचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आगामी काळात त्यांची संख्याही वाढेल, असा टोला रामदेवबाबा यांनी लगावला.  योग हा कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच आपले स्वागत सना उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिरासाठी कायदा करावा

राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरीही तो लोकांचा व देशाच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर प्रश्नासंदर्भात नेमलेल्या मध्यस्थांकडून हा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारनेच कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राममंदिर उभारतील, असे रामदेवबाबा म्हणाले.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडYogaयोग