शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ध्येयवेड्या शिक्षकांमुळे वरवट जि़प़ शाळेला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:40 AM

एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थीसंख्या वाढलीजिल्हास्तरीय स्काऊट मेळाव्यात विद्यार्थ्यांची कामगिरी

सुनील चौरे।हदगाव : एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. प्राथमिक शिक्षण बोलीभाषेतूनच द्यावे, असे शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ज्ञांचे मत असल्यामुळे पालकांचा कल बदलला आहे.जिल्हा परिषद शाळांना काही ध्येयवेड्या शिक्षकांमुळे चांगले दिवस आले आहेत. वेगवेगळे प्रयोग शाळेत करुन घटलेली विद्यार्थीसंख्या वाढविली. गुणवत्ता वाढविली. अशीच मनाठा केंद्रातील वरवट या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळा. आज प्रयोगशील शाळा म्हणून तालुक्यात नावारुपाला आली आहे.जानेवारीमध्ये जिल्हास्तरीय स्काऊट मेळावा हदगावमध्ये झाला. यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्याने चार पारितोषिक मिळविले. ज्ञानरचनाकार, सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शाळेत वर्षभर राबविले जातात. फेसबूकवर या वरवटची शाळा म्हणून अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. येथे शाळेच्या उपक्रमाची माहिती व फोटो अपलोड केले जातात. तत्कालीन जिल्हाधिकारी परदेशी यांच्या प्रयत्नातून शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविण्यात आला़ त्यावेळी शाळेने त्यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला़ त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना स्वत:च्या स्वाक्षरीनिशी अभिनंदनपत्रे पाठविली होती. यामुळे शिक्षकांचा हुरुपही वाढला होता.ध्यास शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविला२०१३-१४ मध्ये ध्यास शिष्यवृत्तीचा हा पॅटर्न राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातून उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये वरवटच्या शाळेतील शिक्षक जयस्वाल यांची निवड झाली होती. जिल्ह्यातील टॉपच्या शिक्षकांनी तालुक्याच्या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते.शाळेचे मुख्याध्यापक म्हणून शाळेचे रुपडे बदलण्यासाठी शिक्षकांची मेहनत आहे़ त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकांचेही सहकार्य आहे़ त्यांना दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करतात़ मेहनत व जिद्दीमुळे आज आमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारुपाला आली आहे़ - खंडू जोशी

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षण