शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना हायकोर्टाचा दणका; खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली

By शिवराज बिचेवार | Updated: May 14, 2024 17:45 IST

१७ जुलै २०१० रोजी बाभळीच्या पाण्यावरून आंदोलन करीत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह आमदार आणि खासदार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या सीमेत घुसले होते.

नांदेड : धर्माबाद आणि तेलंगणा सीमेवरील बाभळी बंधाऱ्याच्या पाणी प्रश्नावरून २०१०मध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह ६६ आमदार, खासदार हे महाराष्ट्राच्या सीमेत घुसले होते. या सर्वांना त्यावेळी धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून धर्माबादच्या आयटीआय येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांना धर्माबाद येथून छत्रपती संभाजीनगर येथील तुरुंगात हलवित असताना चंद्राबाबू नायडू, नक्का आनंदा बाबू व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. या प्रकरणात दाखल असलेला खटला रद्द करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. 

१७ जुलै २०१० रोजी बाभळीच्या पाण्यावरून आंदोलन करीत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह आमदार आणि खासदार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या सीमेत घुसले होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असताना वादावादी झाली होती. या प्रकरणात धर्माबाद पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला, यासह विविध कलमाखाली गुन्हे नोंदविण्यात आले होते. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून धर्माबाद येथील आयटीआयला तुरुंगाचा दर्जा दिला होता. त्यामुळे त्यांना आयटीआय येथे ठेवण्यात आले होते. या ठिकाणी किशन खेडकर यांची सिनिअर कारागृह अधीक्षक म्हणून नेमूणक केली होती. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव उपमहानिरीक्षक कारागृह यांनी सर्व आरोपींना औरंगाबादच्या कारागृहात हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांना औरंगाबादला नेण्यासाठी बसेस तयार असताना चंद्राबाबू नायडू आणि नक्का आनंदा बाबू यांनी पोलिसांना इंग्रजी आणि तेलगू भाषेत शिवीगाळ केली. तसेच जबरदस्ती केल्यास महाराष्ट्र आणि तेलंगणात दहशतीचे वातावरण होईल, अशी धमकी दिली होती. 

आतील गोंधळ ऐकल्यानंतर अतिरिक्त फौजफाटा आयटीआयमध्ये गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत काही कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी शेवटी एक - एक करून सर्व आरोपींना बसेसमध्ये बसवून औरंगाबाद येथे नेले. त्यानंतर या प्रकरणात खेडकर यांच्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा रद्द करावा, अशी याचिका चंद्राबाबू आणि नक्का आनंदा बाबू यांनी केली होती. परंतु, हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळल्याने दोघांनाही मोठा दणका बसला आहे.

... म्हणे वातानुकूलित बसेस हव्यातचंद्राबाबू नायडू यांच्यासह ६६ जणांना आयटीआय येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची राजेशाही व्यवस्था केली होती. परंतु, त्यानंतरही त्यांच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यासाठी वातानुकूलित बसेस पाहिजेत म्हणून ते अडून बसले होते. त्यासाठी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाणही केली.

बाभळीच्या नथीतून तीर मारण्याचा डावमहाराष्ट्र आणि त्यावेळच्या आंध्र प्रदेशात बाभळी धरणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. तोच धागा पकडून चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बाभळीच्या मुद्यावरून आंदोलन केले. त्यासाठी आमदार आणि खासदारांचा मोठा लवाजमा घेऊन महाराष्ट्राच्या सीमेत घुसले. बाभळीच्या नथीतून तीर मारून निवडणुका जिंकण्याचे त्यांचे स्वप्न मात्र त्यावेळी भंगले होते.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDamधरणAndhra Pradeshआंध्र प्रदेशAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ