शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:53 AM

सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.

ठळक मुद्देपीक विमा, राष्ट्रीय महामार्ग जमिनीच्या मोबदल्याचा परिणाम: २०१७ मध्ये १३ तर २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या

सुनील चौरेलोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.तर २४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहेत. सन २०१७-१८ या दोन वर्षांत मात्र ही संख्या घटली. हे एक चांगले लक्षण असून पीक विमा व राष्ट्रीय महामार्गाने जमिनीचा मोबदला हे एक कारण त्यापाठीमागे असल्याची चर्चा आहे.पूर्वी शेतकरी खाजगी सावकारांकडून पेरणी, लग्न, शिक्षणासाठी कर्ज घेत. पिकाला उतारा न आल्याने सावकाराचे कर्ज फिटत नसे व हा आकडा फुगत जायचा. आता शेतकरी हुशार झाले. शेतात पेरलेल्या पिकाचा विमा काढू लागले व अतिवृष्टीने किंवा अल्प पावसाने पीक गेले तर त्याला पीक विम्याचे कवच मिळाले. शासनाच्या वेगवेगळ्या योजना, अनुदानामुळेही शेतकरी सुखावला. पिकाला मिळणारा हमीभाव बाजारपेठेत त्याची होणारी लूटही कायद्याने खरेदी- विक्री आॅनलाईन करुन थांबविल्याने व्यापाºयाचा नफा कमी होऊन तो शेतकºयाच्या पदरात पडू लागला.खते, बी-बियाणे, औषधी यांची खरेदी- विक्री आॅनलाईन झाल्याने काळा बाजार मंदावला. शेततळी, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवारअंतर्गत केलेली बंडींगची कामे याचाही आधार शेतकºयांना झाला.शेतकºयांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत मिळाली. त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला ही काही प्रमुख कारणे सांगता येतील.शेतीला पुरक योजना दुधाळ जनावरे, फळबागा ठिबक, तुषार यांचा पुरवठा करण्यात आला. कमी पावसात येणारे वाण बाजारात आल्याने शेतकºयांना फायदा झाला. १३ गावांतील शेतकºयांच्या जमिनीचे मोजमाप २०१७ पासून सुरू झाले.त्यामुळे जमिनीचा मोबदला चांगला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या व मोबदला मिळालाही. या रकमेचा फायदा सामान्य शेतकºयांसह सधन शेतकºयांनाही झाला. त्याचबरोबर त्यांच्या लेकीबाळी पाहुणे यांनाही झाला.युवक मंडळी पारंपरिक शेती न करता नगदी पिकांकडे वळली. भाजीपाला घेत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी पाण्यात चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत. आत्महत्या करणारी गावे पाहिली तर एकाच गावात वारंवार आत्महत्या घडल्या आहेत.यामध्ये हरडप, मनाठा, निवघा, चोरंबा (बु.), कोहळी, चिकाळा, कोहली, येवली, वायफना, तळेगाव, ल्याहरी, निमगाव, सावरगाव, बरडशेवाळा, पाथरड, पिंगळी, तळणी ही ठरलेली गावे आहेत. यामध्ये भीषण वास्तव म्हणजे मराठा समाजाच्या ४० आत्महत्या आहेत. हा चिंतनाचा विषय आहे.२४ शेतकरी कुुटुंबांना छदामही नाहीसन २०१३ मध्ये ८ आत्महत्या झाल्या. सन २०१४ हाच आकडा १५ वर गेला. सन २०१५ मध्ये २० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. सन २०१६ मध्ये हीच संख्या २३ वर गेली. परंतु, २०१७ मध्ये आकडा कमी झाला व ही संख्या १३ वर आली. सन २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या शेतकºयांनी केल्या. सहा वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ८६ आहे. त्यापैकी ६० शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र ठरली तर २४ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकºयांची प्रकरणे पात्र ठरली त्यांच्या कुटुंबाना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. परंतु, २४ शेतकरी कुटुंबांना छदामही मिळाला नाही. त्यामुळे त्या कुटुंबांच्या अडचणीत वाढच झाली.सावकाराचा जाचक पाशही आवळला !शेतकºयाने आत्महत्या केली की त्यांच्या कुुटुंबाला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे ते आत्महत्या करतात. असा सूर काही वर्षांपूर्वी निघत होता. परंतु, सन २००८ पासूनची अनेक प्रकरणे समितीने अपात्र ठरविल्यामुळे हा आरोप खोटा ठरतो. परंतु, या दोन वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मात्र तालुक्यामध्ये कमी झाले आहे. सतत वाढणारा आकडा सन २०१७ मध्ये १३ वर आला. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता शेतकºयांना मिळणारा पीक विमा. यामुळे अनेक शेतकºयांना पेरणीसाठी वरदान ठरला. खाजगी सावकाराचा जाचक पाशही कायद्याने तोडला.

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfarmer suicideशेतकरी आत्महत्याfundsनिधी