शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्य सरकारमुळे शेतकरी संकटात- अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:47 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन बोंडअळी, पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकºयांना मिळाली नाही, तर आॅनलाईन खरेदीत नियोजन नसल्यामुळे चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात आल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन बोंडअळी, पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकºयांना मिळाली नाही, तर आॅनलाईन खरेदीत नियोजन नसल्यामुळे चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात आल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नव्याने १ कोटी ४१ लक्ष खर्च करून बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आ. अमिता चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यानंतर शेतकरी निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात खा. चव्हाण बोलत होते.मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, गणपतराव तिडके, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.सदस्य प्रकाश देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, आप्पाराव सोमठाणकर, व्यंकटराव कल्याणकर, निबंधक के. एस. पावडे, केशवराव इंगोले, माधवराव कदम, पप्पू पाटील कोंडेकर, गुलाबराव चव्हाण, गोविंदबाबा गौड, सभापती जगदीश पाटील भोसीकर, शेख युसूफ, मनोज गिमेकर, उपसभापती गणेश राठोड उपस्थित होते.यावेळी खा.चव्हाण म्हणाले की, आधारभूत किमतीवर शेतकºयांच्या मालाचे भाव पडल्यास हमी भावाप्रमाणे शासनाने खरेदी करणे आवश्यक असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोप केला. भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा करणारे हे ज्यांची सत्ता असेल त्यांच्याकडे जावून 'जिसका राज उसके पूत बनतात'. असा टोला लगावत मीही युथ काँग्रेस चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता असून चव्हाणांची सभा उधळण्याइतपत ताकद विरोधकांत नाही, असे त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. भोकर ते नांदेड या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तिकडे या कार्यकर्त्यांनी ओरडणे आवश्यक आहे, अशा ओरडणाºया कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धडा शिकवतील, असा इशारा देवून नांदेड जिल्ह्यात सर्व तालुक्यांत पीकविमा मंजूर झाला. परंतु, भोकर मतदारसंघातील अधिकची आणेवारी काढून जाणूनबुजून वंचित ठेवल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला. प्रारंभी प्रास्ताविक सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर रामचंद्र मुसळे यांनी आभार मानले.इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत भाजपा, सेना नेत्यांची नावे नसल्याने पक्षीय भेद करण्यात आल्याचा आरोप करीत भाजपा- सेनेच्या संचालक व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला होता. भूमिपूजन सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून सोडून दिले. पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरी