शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

टंचाई उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:36 IST

पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कोरडेच जिल्ह्यात १६० टँकरने पाणीपुरवठा सुरूपाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता कायम

नांदेड : पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना ३० जूनपर्यंत करण्यास मान्यता होती. मात्र पाऊस लांबल्याने राज्यातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती कायम आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड, लोहा, नायगाव, भोकर, नांदेड, कंधार आदी तालुक्यांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू झाला असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. नांदेड जिल्ह्यात आजघडीला १६१ टँकर सुरू आहेत. या टँकरचे आदेश ३० जूनपर्यंत होते. आवश्यकता भासल्यास हे टँकर पुन्हा सुरू ठेवायचे की नाही? याबाबत १ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील. टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्याचवेळी प्रशासनाकडूनही शासनाला विचारणा केली होती. ही बाब लक्षात घेवून २९ जून रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने टंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ आॅगस्टपर्यंत चारा छावण्यातील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुभा दिली आहे.२०१८-१९ या टंचाई कालावधीत शासनाने पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दर सुचीनुसार १० टक्केपर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे आदेश १५ जुलैपर्यंत लागू राहतील. तसेच विहीर, तलाव उद्भवावरुन डिझेल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून करण्याबाबतचा निर्णयही १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहे.३० जूननंतर टंचाईअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवायच्या असल्यास जिल्हाधिकाºयांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेवून टंचाई असलेल्या भागामध्ये उपाययोजना सुरू ठेवायच्या की नाही? याचा निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे १ जुलै रोजी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेवून टँकर तसेच इतर योजनांबाबत निर्णय होणार आहेत.जिल्ह्यात केवळ ५ टक्के जलसाठानांदेड जिल्ह्यात असलेल्या एकूण १११ प्रकल्पांत आजघडीला केवळ ४.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागीलवर्षी याच कालावधीत हा जलसाठा २० टक्के इतका होता. जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी १ विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे तर मानार प्रकल्पात १०.९० दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्याची टक्केवारी ७.८९ इतकी आहे. नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये २.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या मध्यम प्रकल्पांची क्षमता ३०.५८ दलघमी इतकी असताना आज या प्रकल्पात केवळ ३.५१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात ८ उच्चपातळी बंधारे आहेत. या बंधाºयात ८.६ दलघमी म्हणजे ४.७८ टक्के जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या लघु प्रकल्पात ८.१५ दलघमी जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण जलसाठा २०.६२ दलघमी इतका असून त्याची टक्केवारी ४.२३ इतकी आहे.लोहा न.प.ने केली टँकरची मागणीलोहा शहराला २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकर आदेशाची मुदत ३० जून रोजी संपत आहे. लोहा शहर व ग्रामीण भागात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना असलेल्या सुनेगाव तलावातही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. सुनेगाव तलावातून लोहा शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे लोहा शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मुदत आणखी ३० दिवस वाढवून देण्याची मागणी लोहा न.प.च्या मुख्याधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई