शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

टंचाई उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:36 IST

पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कोरडेच जिल्ह्यात १६० टँकरने पाणीपुरवठा सुरूपाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता कायम

नांदेड : पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना ३० जूनपर्यंत करण्यास मान्यता होती. मात्र पाऊस लांबल्याने राज्यातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती कायम आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड, लोहा, नायगाव, भोकर, नांदेड, कंधार आदी तालुक्यांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू झाला असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. नांदेड जिल्ह्यात आजघडीला १६१ टँकर सुरू आहेत. या टँकरचे आदेश ३० जूनपर्यंत होते. आवश्यकता भासल्यास हे टँकर पुन्हा सुरू ठेवायचे की नाही? याबाबत १ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील. टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्याचवेळी प्रशासनाकडूनही शासनाला विचारणा केली होती. ही बाब लक्षात घेवून २९ जून रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने टंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ आॅगस्टपर्यंत चारा छावण्यातील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुभा दिली आहे.२०१८-१९ या टंचाई कालावधीत शासनाने पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दर सुचीनुसार १० टक्केपर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे आदेश १५ जुलैपर्यंत लागू राहतील. तसेच विहीर, तलाव उद्भवावरुन डिझेल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून करण्याबाबतचा निर्णयही १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहे.३० जूननंतर टंचाईअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवायच्या असल्यास जिल्हाधिकाºयांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेवून टंचाई असलेल्या भागामध्ये उपाययोजना सुरू ठेवायच्या की नाही? याचा निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे १ जुलै रोजी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेवून टँकर तसेच इतर योजनांबाबत निर्णय होणार आहेत.जिल्ह्यात केवळ ५ टक्के जलसाठानांदेड जिल्ह्यात असलेल्या एकूण १११ प्रकल्पांत आजघडीला केवळ ४.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागीलवर्षी याच कालावधीत हा जलसाठा २० टक्के इतका होता. जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी १ विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे तर मानार प्रकल्पात १०.९० दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्याची टक्केवारी ७.८९ इतकी आहे. नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये २.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या मध्यम प्रकल्पांची क्षमता ३०.५८ दलघमी इतकी असताना आज या प्रकल्पात केवळ ३.५१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात ८ उच्चपातळी बंधारे आहेत. या बंधाºयात ८.६ दलघमी म्हणजे ४.७८ टक्के जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या लघु प्रकल्पात ८.१५ दलघमी जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण जलसाठा २०.६२ दलघमी इतका असून त्याची टक्केवारी ४.२३ इतकी आहे.लोहा न.प.ने केली टँकरची मागणीलोहा शहराला २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकर आदेशाची मुदत ३० जून रोजी संपत आहे. लोहा शहर व ग्रामीण भागात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना असलेल्या सुनेगाव तलावातही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. सुनेगाव तलावातून लोहा शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे लोहा शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मुदत आणखी ३० दिवस वाढवून देण्याची मागणी लोहा न.प.च्या मुख्याधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई